अतुल जयस्वाल / अकोला केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत महावितरणच्या सहकार्याने विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये शेतकर्यांसाठी सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत असली तरी या योजनेचा लाभ घेण्याबाबत शेतकरी उदासीन असल्याचे दिसून येत आहे. या योजनेसाठी आतापर्यंत पात्र ठरलेल्या महावितरणच्या अकोला परिमंडळातील तीन जिल्ह्यांमधील १६३४ लाभार्थींपैकी केवळ २१२ जणांनीच सौर कृषिपंपासाठी लाभार्थी हिश्श्याची रक्कम जमा करून कोटेशन भरल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. राज्यातील अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात शेतकर्यांच्या कृषिपंपांना पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. विहिरींना पाणी असूनही केवळ विजेअभावी सिंचनात अडथळे येतात. यावर शाश्वत तोडगा म्हणून शेतकर्यांना अनुदानावर सौर कृषिपंप वितरित करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थी शेतकर्यांना ७.५ अश्वशक्तीपासून ते ३ अश्वशक्ती क्षमतेचा सौर ऊज्रेवर चालणारा कृषिपंप देण्यात येतो. पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. यासाठी लाभार्थी हिस्सा म्हणून शेतकर्याला केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागते. केंद्र सरकार ३0 टक्के, तर राज्य सरकार पाच टक्के अनुदान देते. उर्वरित ६0 टक्के रक्कम कर्जस्वरूपात उपलब्ध करून देणार असून, हे कर्ज महावितरण टप्प्याटप्प्याने फेडणार आहे. तीन जिल्ह्यांतील सद्य:स्थितीजिल्हा पात्र लाभार्थी कोटेशन भरलेले लाभार्थीअकोला ९३५ ५५बुलडाणा ३८५ १२५वाशिम ३१४ ३२--------------------------------------------------एकूण १६३४ २१२
सौर कृषिपंपाकडे शेतक-यांची पाठ
By admin | Updated: June 10, 2016 02:05 IST