शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

माती परीक्षणाकडे ८५ टक्के शेतक-यांची पाठ

By admin | Updated: June 15, 2015 02:08 IST

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील ८५ शेतक-यांकडून आजपर्यंंत एकदाही माती परीक्षण करण्यात आले नाही.

अकोला- विदर्भातील शेतकर्‍यांनी जमिनीचा पोत ओळखून पीक घेण्यासाठी माती परीक्षण करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील ८५ शेतकर्‍यांकडून आजपर्यंंत एकदाही माती परीक्षण करण्यात आले नाही. माती परीक्षणाबाबत माहिती असून, केवळ प्रयोगशाळा लांबवर असल्याने माती परीक्षणाकडे शेतकरी पाठ फिरवित असल्याचे सत्य डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राबविलेल्या संशोधन प्रकल्पातून उघड झाले. पीडीकेव्हीच्या विस्तार शिक्षण विभागातर्फे विदर्भातील सहा जिल्ह्यात माती परीक्षणासंदर्भातील संशोधन प्रकल्प राबविण्यात आला. हा प्रकल्प राबवित असताना आढळून आलेले तथ्य राज्य आणि केंद्र शासनाच्या धोरणाला धक्का पोहोचविणारे आहे. रासायनिक खतांवर होणारा खर्च आणि खतांच्या वाढत्या किमती यामुळे अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांसाठी उत्पादनावरील खर्च कमी करण्याच्या उद्देशाने माती परीक्षणावर भर दिला जात आहे. माती परीक्षण करून आवश्यक त्या खतांचा आणि आवश्यक तेवढाच वापर करून जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, शेतकर्‍यांना याची जाणीव असून, ८५ टक्के शेतकर्‍यांनी माती परीक्षणाकडे पाठ फिरविल्याचे वास्तव पीडीकेव्हीच्या संशोधन प्रकल्पादरम्यान आढळून आले. प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या सर्वेक्षणातून तयार करण्यात आलेल्या या संशोधनाला २८ ते ३0 मेदरम्यान राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात झालेल्या संयुक्ती कृषी संशोधन आणि विस्तार समितीच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर राज्य शासनालाही हा अहवाल देण्यात आला. हे सर्वेक्षण पीडीकेव्हीचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाचे विस्तार शिक्षण विभागाचे संचालक तथा विभागप्रमुख डॉ. डी.एम. मानकर, प्रा. डॉ. एन.एम. काळे, डॉ. पी.पी. वानखेडे, डॉ. पी.पी. भोपळे, डॉ.आर.एस. वाघमारे यांनी केले.