शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

दहावी निकाल सुधार प्रकल्पाची अकोल्यात सुरुवात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 10:22 IST

दहावी निकाल सुधार प्रकल्प सुरू केला असून, राज्यातील हा पहिला प्रयोग आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: इयत्ता दहावीची घसरत चाललेली टक्केवारी लक्षात घेता, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी आणि निकालाची टक्क्यात वाढ व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी पुढाकार घेत, दहावी निकाल सुधार प्रकल्प सुरू केला असून, राज्यातील हा पहिला प्रयोग आहे. मंगळवारी मुख्याध्यापकांनी दहावीचा निकाल वाढविण्याबाबतचे सादरीकरण सीईओ आयुष प्रसाद यांच्यासमोर सादर केले.यावर्षी इयत्ता दहावीचा निकाल विभागात सर्वात कमी लागला आहे. दहावी निकालाची घसरलेली टक्केवारी चिंताजनक आहे. पुढील निकालात दहावीची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पुढाकार घेतला आहे. सीईओ आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या समन्वयातून दहावी निकाल सुधार प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत इयत्ता दहावीचा १00 टक्के निकाल आणि शाळा गुणवत्ता वाढीसाठी मुख्याध्यापकांचे व्हिजन काय आहे, हे जाणून घेण्यासाठी मुख्याध्यापकांच्या बैठका आयोजित केल्या आहेत. दहावीचा निकाल कसा वाढवायचा, याचे सादरीकरण जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना सीईओ आयुष प्रसाद यांच्यासमोर करायचे आहे. मंगळवार, ५ नोव्हेंबरपासून त्याची जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात सुरुवात झाली. यावेळी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, विभागीय शिक्षण मंडळ सदस्य प्रा. नरेंद्र लखाडे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष बळीराम झामरे, जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता व व्यावसायिक विकास संस्थेच्या प्रतिनिधी कविता बोरसे, शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद जाधव, डॉ. साबीर कमाल आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षण