शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

तंटामुक्त गावांना मिळणार ४६ कोटी रुपये

By admin | Updated: December 2, 2014 23:43 IST

राज्यातील १ हजार ७४१ गावे पुरस्कारासाठी पात्र.

डॉ. किरण वाघमारे/अकोलामहात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत सहभागी होऊन आपले गाव तंटामुक्त करणार्‍या ग्रामपंचायतींना निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार राज्यातील १ हजार ७४१ गावांना ४६ कोटी रुपये पुरस्कार स्वरुपात मिळणार आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम गत सहा वर्षांपासून सुरु आहे. २00८ साली तंटामुक्त गाव मोहिम अभियानाला सुरुवात झाली. १५ ऑगस्ट २0१३ पासून सुरु झालेले या मोहिमेचे सहावे वर्ष १५ ऑगस्ट २0१४ रोजी संपले. या वर्षात राज्यातील अनेक गावांनी मोहिमेत सहभाग घेतला. ग्रामसभा घेवून या गावांनी आपला मोहिमेतील सहभाग निश्‍चित केला. मोहिमेतील तंटामुक्त गाव समितीने भविष्यात तंटे होवू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि गावातील दाखल केलेल्या दिवाणी, महसुली व इतर तंट्यांची माहिती ३0 सप्टेंबर २0१२ पर्यंत संकलीत करावयाची होती. या सर्व बाबींची पुर्तता योग्य पद्धतीने करणार्‍या गावांना तंटामुक्तीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. १४ ऑगस्ट २0१४ च्या शासन निर्णयानुसार तंटामुक्त गावांचे निकष स्वंयमूल्यमापनानुसार पूर्ण करणार्‍या गावांचा तंटामुक्त पुरस्काराच्या पुढील टप्प्यासाठी निवड झाली. १ मे २0१३ रोजी ग्रामसभा घेवून गाव तंटामुक्त झाल्याची घोषणा करणार्‍या गावांचे ५ मे ते ५ जून २0१३ या कालावधीत जिल्ह्यातंर्गत मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनात २ हजार १३६ गावे पुरस्कारासाठी पात्र ठरली. २0 जून ते २0 जुलै २0१३ या कालावधीत या गावांचे जिल्हाबाह्य मूल्यांकन करण्यात आले. मूल्यांकन करणार्‍या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला. या अहवालानुसार राज्यातील १ हजार ७४१ गावे तंटामुक्त पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. यामध्ये ४७ गावे ही २00 पैकी १९0 व त्यापेक्षा अधिक गुण घेवून शांतता पुरस्कारासाठी पात्र झाली आहेत. २00१ च्या जनगणनेच्या निकषानुसार या गावांना लोकसंख्येप्रमाणे ४६ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपये पुरस्कार स्वरुपात मिळणार आहेत. या निधीचा उपयोग गावाच्या विकासासाठी करता येणार आहे.