शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गावांना मिळणार ४६ कोटी रुपये

By admin | Updated: December 2, 2014 23:43 IST

राज्यातील १ हजार ७४१ गावे पुरस्कारासाठी पात्र.

डॉ. किरण वाघमारे/अकोलामहात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत सहभागी होऊन आपले गाव तंटामुक्त करणार्‍या ग्रामपंचायतींना निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार राज्यातील १ हजार ७४१ गावांना ४६ कोटी रुपये पुरस्कार स्वरुपात मिळणार आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम गत सहा वर्षांपासून सुरु आहे. २00८ साली तंटामुक्त गाव मोहिम अभियानाला सुरुवात झाली. १५ ऑगस्ट २0१३ पासून सुरु झालेले या मोहिमेचे सहावे वर्ष १५ ऑगस्ट २0१४ रोजी संपले. या वर्षात राज्यातील अनेक गावांनी मोहिमेत सहभाग घेतला. ग्रामसभा घेवून या गावांनी आपला मोहिमेतील सहभाग निश्‍चित केला. मोहिमेतील तंटामुक्त गाव समितीने भविष्यात तंटे होवू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि गावातील दाखल केलेल्या दिवाणी, महसुली व इतर तंट्यांची माहिती ३0 सप्टेंबर २0१२ पर्यंत संकलीत करावयाची होती. या सर्व बाबींची पुर्तता योग्य पद्धतीने करणार्‍या गावांना तंटामुक्तीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. १४ ऑगस्ट २0१४ च्या शासन निर्णयानुसार तंटामुक्त गावांचे निकष स्वंयमूल्यमापनानुसार पूर्ण करणार्‍या गावांचा तंटामुक्त पुरस्काराच्या पुढील टप्प्यासाठी निवड झाली. १ मे २0१३ रोजी ग्रामसभा घेवून गाव तंटामुक्त झाल्याची घोषणा करणार्‍या गावांचे ५ मे ते ५ जून २0१३ या कालावधीत जिल्ह्यातंर्गत मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनात २ हजार १३६ गावे पुरस्कारासाठी पात्र ठरली. २0 जून ते २0 जुलै २0१३ या कालावधीत या गावांचे जिल्हाबाह्य मूल्यांकन करण्यात आले. मूल्यांकन करणार्‍या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला. या अहवालानुसार राज्यातील १ हजार ७४१ गावे तंटामुक्त पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. यामध्ये ४७ गावे ही २00 पैकी १९0 व त्यापेक्षा अधिक गुण घेवून शांतता पुरस्कारासाठी पात्र झाली आहेत. २00१ च्या जनगणनेच्या निकषानुसार या गावांना लोकसंख्येप्रमाणे ४६ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपये पुरस्कार स्वरुपात मिळणार आहेत. या निधीचा उपयोग गावाच्या विकासासाठी करता येणार आहे.