शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

तूर डाळीचे किरकोळ दर १५0 रुपये प्रतिकिलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2016 02:13 IST

घाऊक आणि किरकोळ दरात प्रचंड तफावत, तुरीचे उत्पादन पन्नास टक्के घटले.

राजरत्न सिरसाट/अकोला: गतवर्षी पाऊस कमी झाल्याने इतर पिकांसह डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घटले असून, यातील जीवनसत्त्वयुक्त तूर डाळीचे उत्पादन विदर्भासह राज्यात सरासरी ५0 टक्क्यांच्यावर घटल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या डाळीचे दर पुन्हा वाढले असून, घाऊक बाजारात १२,५00 रुपये क्विंटलच्यावर, तर किरकोळ बाजारात दीडशे रुपये प्रतिकिलोच्या जवळपास दर आहेत. दरम्यान, घाऊक आणि किरकोळ दरात प्रचंड तफावत असल्याने सामान्य ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे. भारतात तूर या कडधान्याचे सर्वाधिक क्षेत्र हे महाराष्ट्रात आहे. मागील वर्षी ९३.२0 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. यावर्षी पावसाला विलंब झाल्याने तुरीचे लागवड क्षेत्र घटले असून, ते ८३.२४ लाख हेक्टरपर्यंत घसरले आहे. यावर्षी यात आणखी घसरण झाली आहे. तूर पीक मुख्यत: कोरडवाहू क्षेत्रात घेतले जाते. यावर्षी या पिकाचे उत्पादन २.७४ लाख टन अपेक्षित होते; पण यामध्ये प्रचंड घसरण झाली आहे. महाराष्ट्रात १0 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड होते. २0१३-१४ मध्ये हेक्टरी ८ क्विंटल ८१ किलो उत्पादन झाले; तथापि २0१५-१६ यावर्षी या उत्पादनात घसरण झाली असून, हेक्टरी केवळ ७00 किलो म्हणजे सात क्विंटलच्या आत उत्पादन झाले आहे. अपेक्षित हेक्टरी उत्पादन ११ क्विंटलच्या वर हवे होते; पण गतवर्षी ऐन फुलोरा, शेंगा येण्याच्या अवस्थेत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पावसाने दडी मारली होती. त्याचा फटका या पिकाला बसला आहे. परिणामी या डाळीचे किरकोळ बाजारातील दर आजमितीस दीडशे रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले. या दरवाढीचा सामान्यांच्या खिशावर ताण पडला आहे.