शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षे उशिराने जैवविविधता समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 11:38 IST

महाराष्ट्र जैवविविधता नियम २००८ मध्येच लागू झाले असून, त्याची अंमलबजावणी करण्यास तब्बल दहा वर्षे उशीर झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : येत्या काळात पर्यावरणाचा होत असलेला ºहास काही प्रमाणात रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील जैवविविधतेचे संरक्षण करण्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जैविक विविधता व्यवस्थापन समिती गठित करून संरक्षण करण्याचे बंधनकारक केले जात आहे. विशेष म्हणजे, जैवविविधता कायदा २००२, कलम व नियम २००४ मधील नियम २२ नुसार महाराष्ट्र जैवविविधता नियम २००८ मध्येच लागू झाले असून, त्याची अंमलबजावणी करण्यास तब्बल दहा वर्षे उशीर झाला आहे.केंद्र शासनाने जैवविविधता कायदा २००२ केला आहे. त्यातील कलम व नियमानुसार २००४ मध्ये नियम तयार करण्यात आले. नियम २२ नुसार महाराष्ट्र राज्य जैवविविधता नियम २००८ मध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्याचे ठरले आहे. त्यामध्ये नियम २३ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जैविक विविधता व्यवस्थापन समिती गठित करावी लागते. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये या समितीला जैवविविधतेच्या संरक्षणासाठी काम करावे लागणार आहे. त्यामध्ये जैवविविधतेसंदर्भात स्थानिक व देशी समाजाचे पारंपरिक ज्ञान, पद्धती, त्यामध्ये नवपरिवर्तनाच्या माध्यमातून जैविक संसाधनाचे संरक्षण करणे, नैसर्गिक पोषकता, उपयोगिता टिकवून ठेवण्यासाठी समितीच्या सदस्यांना काम करावे लागणार आहे. प्रत्येक गावातील जैवविविधता नोंदवही तयार केली जाणार आहे. हा दस्तऐवज कायमस्वरूपी तयार राहील. त्यानुसार जैवविविधतेचे संरक्षण निरंतरपणे करावे लागणार आहे.

टॅग्स :Akolaअकोला