शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मराठीच्या पेपरलाच दहा कॉपीबहाद्दर निलंबित

By admin | Updated: March 2, 2016 02:50 IST

दहावीची परीक्षेदरम्यान शिक्षण विभागाच्या पथकांची अकोल्यात कारवाई.

अकोला: इयत्ता दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. मराठी विषयाचा मंगळवारी पहिला पेपर होता. पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाच्या तीन पथकांनी परीक्षा केंद्रांवर धाडी टाकून दहा कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना निलंबित केले. जिल्ह्यातील ११६ परीक्षा केंद्रांवर मंगळवारपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. एकूण ३१ हजार ५८४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. मराठी विषयाचा पेपर असल्याने परीक्षेला शांततेत सुरुवात होईल. अशी अपेक्षा होती; परंतु पहिल्याच दिवशी कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर कारवाई झाली. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या पथकाने पातूर तालुक्यातील चरणगाव येथील चेतना विद्यालय परीक्षा केंद्रावर अचानक धाड घातली. या परीक्षा केंद्रावर तीन विद्यार्थ्यांना कॉपी करताना पथकाने रंगेहात पकडले. त्यांना निलंबित करण्यात आले. दुसरी कारवाई शिक्षणाधिकारी (माध्यमिक)प्रकाश मुकुंद यांच्या पथकाने केली. आळंदा येथील जय बजरंग विद्यालय परीक्षा केंद्रावर तीन कॉपीबहाद्दरांना कॉपी करताना पकडले. विशेष म्हणजे, जय बजरंग विद्यालय परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी धाड घालून कॉपी करताना काही विद्यार्थ्यांना पकडले होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या पथकाने बाश्रीटाकळी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालय परीक्षा केंद्रावर धाड घालून दोन विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले व निलंबित केले. परांडा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय परीक्षा केंद्रावरही कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी पथकाने दोन विद्यार्थ्यांना निलंबित केले. ही कारवाई शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर, शिक्षण विस्तार अधिकारी स्मिता परोपटे, आत्माराम राठोड यांनी केली.