शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

धबधब्यासोबत सेल्फीचा मोह बेतू शकतो जीवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST

अकोला : या वर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेतच, शिवाय डोंगराळ भागातील ओढे ...

अकोला : या वर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेतच, शिवाय डोंगराळ भागातील ओढे व धबधबेही ओसंडून वाहत आहेत. पावसाने वातावरण आल्हाददायक झाल्याने सुट्यांच्या दिवशी पर्यटकांची पावले निसर्गाकडे वळत आहेत. अकोला जिल्ह्यात पातूर व अकोट तालुक्यातील डोंगराळ भागात धबधबे आहेत. सध्या या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी दिसून येते. धबधब्यांमध्ये जलक्रीडेचा आनंद घेतानाच सेल्फी घेण्याचा माेह अनेकांना आवरत नाही. तथापि, स्वत:च्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास सेल्फीचा हा मोह जीवावरही बेतू शकतो. निसरड्या खडकांवरून पाय घसरून कपाळमोक्ष होण्याची भीती असल्याने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. पर्यटकांनी सुरक्षेला प्राधान्य देणे गरजेचे असले, तरी बहुतांश ठिकाणी तसे होताना दिसत नाही.

पर्यटनाला जा, पण काळजी घ्या !

धोदानी धबधबा

पातूर तालुक्यातील डोंगराळ भागात हा छोटा धबधबा आहे. दुर्गम भागात असल्यामुळे या धबधब्यावर फारसे पर्यटक दिसत नाहीत. माळराजुरा पर्यटन केंद्रापासून गोंधळवाडी गावाकडे जाताना हा धबधबा आहे. मोर्णा नदीचा एक प्रवाह खडकावरून खाली उतरतो. या ठिकाणी हौशी पर्यटक येतात.

सुलईनाला/ सूर्या धबधबा

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी मेळघाट अभयारण्यात हा धबधबा आहे. भौगोलिकदृष्ट्या हा धबधबा अमरावती जिल्ह्यात येत असला, तरी अकोट शहरापासून जवळ असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील पर्यटक या ठिकाणी मोठी गर्दी करतात. अकोट येथून पोपटखेड मार्गे खटकाली टी पाॅइंटजवळ सुलईनाला किंवा सूर्या धबधबा आहे.

धारगड

अकोट तालुक्यात सातपुडा डोंगरात हा धबधबा आहे. या ठिकाणी गुहेत शिवलिंग असून, दरवर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भाविक मोठ्या संख्येने येतात. कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून यात्रा बंद आहे. नरनाळा किल्ल्याला भेट देणारे पर्यटक आवर्जून धारगडला भेट देतात. या ठिकाणाला पर्यटनापेक्षा धार्मिक महत्त्व अधिक आहे.

धोक्याची सूचना देणारे कोणीही नाही

पातूर तालुक्यातील धोदानी धबधबा दुर्गम भागात असल्याने या ठिकाणी वनविभागाचा कोणीही कर्मचारी दिसून येत नाही. तसेच या ठिकाणी खबरदारी घेण्याचा इशारा देणारे फलकही नाहीत. सुलई धबधबा मेळघाट अभयारण्यात येत असल्यामुळे या ठिकाणी जाणाऱ्यांची चेकपोस्टवरील कर्मचाऱ्यांकडून चौकशी केली जाते. या धबधब्याचा इशारा देणारी फलके असली तरी त्याकडे कुणी फारसे लक्ष देत नाही.

जबाबदारी कुणाची?

पर्यटनस्थळी विशेषत: उंच डोंगरात असलेल्या धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांनी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. अपघात होऊ नये यासाठी वनविभागाकडून नागरिकांना सूचना दिल्या जातात. परंतु, अनेकदा नागरिकांकडून त्याचे पालन होत नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.