शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

दहा हजारांत तलाठीच झाले तहसीलदार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:14 IST

तेल्हारा : तलाठ्याच्या हातून सात-बारामध्ये झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी नागरिक तलाठ्याकडे गेले, मात्र चूक दुरुस्तीकरिता तहसीलदारांचे आदेश लागतात, त्यामुळे ...

तेल्हारा : तलाठ्याच्या हातून सात-बारामध्ये झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी नागरिक तलाठ्याकडे गेले, मात्र चूक दुरुस्तीकरिता तहसीलदारांचे आदेश लागतात, त्यामुळे आपण तहसीलदारांकडे प्रकरण दाखल करा, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. परंतु, दहा हजार रुपये दिल्यानंतर त्याच जनतेसाठी तलाठीच जणू तहसीलदार होऊन सात-बारामधील दुरुस्ती करीत असल्याचे समाेर आले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे

एका प्लॉटधारकाने प्लॉट खरेदी केल्यानंतर त्याची नोंद महसूल दप्तरी झाली. त्याचा सात-बाराही मिळाला. परंतु, संबंधित प्लॉटधारकाने खासगी कामाकरिता प्लॉटचा सात-बारा काढला असता त्याच्या नावासमोर कंस आला म्हणजे त्या प्लॉटधारकाने तो प्लॉट विकला, असे दर्शविते. त्यामुळे संबंधित चूक ही तलाठ्याकडूनच झालेली असताना तलाठ्यांनी प्लॉटधारकाला ही चूक दुरुस्त करण्यासाठी नियमाप्रमाणे आपण तहसीलदारांकडे अर्ज करून प्रकरण दाखल करा, त्यानंतर तहसीलदारांचे आदेश मिळाल्यानंतर सात-बारामधील चूक दुरुस्त केली जाईल, असे सांगितले. याकरिता वेळ लागेल, असे सांगून मोकळे झाल्यामुळे संबंधित प्लॉटधारकाची काहीही चूक नसताना नाहक हेलपाटे व होणारा विलंब बघता पुढील खासगी काम थांबल्याने हतबल झाले. परंतु तेच काम एका खासगी माणसामार्फत तलाठ्याकडे दिले असता १० हजार रुपयांमध्ये चूक दुरुस्तीचा सौदा झाला असता, त्या प्लॉटधारकाकरिता तलाठीच जणू तहसीलदार झाले. त्यांनीच काय होत्याचे नव्हते केले. प्लॉटधारकाला ना तहसीलदार, ना इतर कोठेही जाण्याची गरज पडली नाही व सात-बारामधील चूक दुरुस्त झाली, मात्र काहीही कारण नसताना प्लॉटधारकाला आर्थिक भुर्दंड का? या तलाठ्याने चूक दुरुस्ती व नोंदीकरिता १० हजार व ३० हजार रुपये असे फिक्स रेट ठरवून दिल्याची चर्चा आहे. अनेकांना रक्कम ऐकून तर धक्केच बसत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत जनजागृती करून जनतेकडून होणारी लूट थांबवावी, अशी जनतेमधून मागणी होत आहे. या प्रकरणात प्लॉटधारक तक्रार करणार असल्याची माहिती आहे.

........................

ऑनलाइन केली जाते दुरुस्ती

याबाबत तहसीलदारांकडून सदर प्रकरण कसे हाताळले जाते, याची माहिती घेतली असता तलाठी हे सात-बारामधील चूक दुरुस्ती ही १५५ खाली आमच्याकडे ऑनलाइन पाठवतात. आम्ही ऑनलाइन थंब मारून देतो व चूक दुरुस्ती होऊन जाते. याबाबत जनतेला माहिती नसल्यामुळे नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.