शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Teacher's Day Special : आजीने शिकविले; शिक्षक अन् ग्रंथांनी घडविले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 10:24 IST

Teacher's Day Special : वडिलांना मी नेहमी म्हणायचो, मला खाऊ नको. मला विज्ञान साहित्य व ग्रंथ पाहिजे.

- संजय उमक ।लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : माझे बालपण आजीकडे अमरावतीच्या करजगावात गेले. शांताबाई चौधरी माझी आजी. ती शिक्षिका, तिने केलेल्या संस्कारांमुळे ती माझी पहिली गुरू, दुसऱ्या वर्गात मुरंबा या मूळ गावी राम मंदिराच्या पारावर शाळा भरत असे. चारही वर्गांना ‘गुलाबराव गुरुजी’ शिकवायचे.

गुलाबराव गुरुजी माझे आदर्श

गावात रस्त्याची सोय नसतानादेखील गुलाबराव गुरुजी चिखल तुडवत शाळेच्या वेळेत हजर असायचे. आम्हीसुद्धा त्यांची चातकासारखी वाट पाहत राहायचो. एखाद्या दिवशी गुरुजींना थोडा वेळ झाला तर आम्ही त्यांना गावच्या वेशीपर्यंत पाहायला जायचो. असे गुरू-शिष्याचे नाते दृढ झाले. गुलाबराव गुरुजी माझे आदर्श तर जगद्गुरू हे माझे प्रेरणास्रोत आहे.

वडिलांच्या श्रमाचे फलित करायचे हा संकल्पमूर्तिजापूरच्या गाडगे महाराज विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण करून अमरावती व्हीएमव्ही महाविद्यालयात प्रवेश घेतला. वडिलांचे शिक्षण बडोदा येथे झाल्याने त्यांनी मला बडोदा येथील सयाजीराव गायकवाड विद्यापीठात दाखल केले. अनेक मुलांसोबत वसतिगृहात राहताना वेगवेगळे कडू-गोड अनुभव आले.वडिलांच्या जीवावर मौजमजा करणारे विद्यार्थी बघितल्याने काळीज जळाले. मी तेव्हाच निर्णय घेतला वडिलांच्या श्रमाचे फलित करायचे आणि मला तिथून नवी दृष्टी मिळाली व शिक्षणाचे महत्त्व कळले. तोच माझ्या जीवनातला ‘टर्निंग पॉइंट’ ठरला.

अन् सुपर कॉम्प्युटर तयार केला...सुपर कॉम्प्युटर ‘महासंगणक’ बुद्धी, कौशल्य, आत्मविश्वासाच्या जोरावर सहकार्याच्या मदतीने दोन वर्षात जगासमोर आणला. हा संगणक केवळ अमेरिकेकडे होता. त्याचे पेटंट ते द्यायला तयार नव्हते. तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी जबाबदारी दिली. कधीही न पाहिलेला महासंगणक तयार करणे मोठे जिकिरीचे काम होते. तरीही ते आव्हान पेलले. तीन वर्षांचा कालावधी आम्हाला दिला तो कालावधी पूर्ण व्हायच्या अगोदर कमी खर्चात तो पूर्ण केला.खाऊ नाही ग्रंथच मागितलेवडील बाजारातून खाऊ आणायचे. वडिलांना मी नेहमी म्हणायचो, मला खाऊ नको. मला विज्ञान साहित्य व ग्रंथ पाहिजे. त्यानंतर वडील एकामागून एक विज्ञान साहित्य व ग्रंथ आणत गेले. त्या साहित्यातून व ग्रंथातून घरीच मोठी प्रयोगशाळा व ग्रंथालय उभे राहिले. या ग्रंथांनी जीवन घडविले.घरचे वातावरण, शिक्षण, पुस्तकांचे वाचन आणि संस्कार महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वत:मधील क्षमता व आत्मविश्वास जागृत होतो. तसेच चालून आलेल्या संधीचे सोने केले पाहिजे. - पद्मश्री डॉ़ विजय भटकर

 

टॅग्स :AkolaअकोलाTeachers Dayशिक्षक दिनMurtijapurमुर्तिजापूर