शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

Teacher's Day Special : आजीने शिकविले; शिक्षक अन् ग्रंथांनी घडविले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 10:24 IST

Teacher's Day Special : वडिलांना मी नेहमी म्हणायचो, मला खाऊ नको. मला विज्ञान साहित्य व ग्रंथ पाहिजे.

- संजय उमक ।लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : माझे बालपण आजीकडे अमरावतीच्या करजगावात गेले. शांताबाई चौधरी माझी आजी. ती शिक्षिका, तिने केलेल्या संस्कारांमुळे ती माझी पहिली गुरू, दुसऱ्या वर्गात मुरंबा या मूळ गावी राम मंदिराच्या पारावर शाळा भरत असे. चारही वर्गांना ‘गुलाबराव गुरुजी’ शिकवायचे.

गुलाबराव गुरुजी माझे आदर्श

गावात रस्त्याची सोय नसतानादेखील गुलाबराव गुरुजी चिखल तुडवत शाळेच्या वेळेत हजर असायचे. आम्हीसुद्धा त्यांची चातकासारखी वाट पाहत राहायचो. एखाद्या दिवशी गुरुजींना थोडा वेळ झाला तर आम्ही त्यांना गावच्या वेशीपर्यंत पाहायला जायचो. असे गुरू-शिष्याचे नाते दृढ झाले. गुलाबराव गुरुजी माझे आदर्श तर जगद्गुरू हे माझे प्रेरणास्रोत आहे.

वडिलांच्या श्रमाचे फलित करायचे हा संकल्पमूर्तिजापूरच्या गाडगे महाराज विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण करून अमरावती व्हीएमव्ही महाविद्यालयात प्रवेश घेतला. वडिलांचे शिक्षण बडोदा येथे झाल्याने त्यांनी मला बडोदा येथील सयाजीराव गायकवाड विद्यापीठात दाखल केले. अनेक मुलांसोबत वसतिगृहात राहताना वेगवेगळे कडू-गोड अनुभव आले.वडिलांच्या जीवावर मौजमजा करणारे विद्यार्थी बघितल्याने काळीज जळाले. मी तेव्हाच निर्णय घेतला वडिलांच्या श्रमाचे फलित करायचे आणि मला तिथून नवी दृष्टी मिळाली व शिक्षणाचे महत्त्व कळले. तोच माझ्या जीवनातला ‘टर्निंग पॉइंट’ ठरला.

अन् सुपर कॉम्प्युटर तयार केला...सुपर कॉम्प्युटर ‘महासंगणक’ बुद्धी, कौशल्य, आत्मविश्वासाच्या जोरावर सहकार्याच्या मदतीने दोन वर्षात जगासमोर आणला. हा संगणक केवळ अमेरिकेकडे होता. त्याचे पेटंट ते द्यायला तयार नव्हते. तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी जबाबदारी दिली. कधीही न पाहिलेला महासंगणक तयार करणे मोठे जिकिरीचे काम होते. तरीही ते आव्हान पेलले. तीन वर्षांचा कालावधी आम्हाला दिला तो कालावधी पूर्ण व्हायच्या अगोदर कमी खर्चात तो पूर्ण केला.खाऊ नाही ग्रंथच मागितलेवडील बाजारातून खाऊ आणायचे. वडिलांना मी नेहमी म्हणायचो, मला खाऊ नको. मला विज्ञान साहित्य व ग्रंथ पाहिजे. त्यानंतर वडील एकामागून एक विज्ञान साहित्य व ग्रंथ आणत गेले. त्या साहित्यातून व ग्रंथातून घरीच मोठी प्रयोगशाळा व ग्रंथालय उभे राहिले. या ग्रंथांनी जीवन घडविले.घरचे वातावरण, शिक्षण, पुस्तकांचे वाचन आणि संस्कार महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वत:मधील क्षमता व आत्मविश्वास जागृत होतो. तसेच चालून आलेल्या संधीचे सोने केले पाहिजे. - पद्मश्री डॉ़ विजय भटकर

 

टॅग्स :AkolaअकोलाTeachers Dayशिक्षक दिनMurtijapurमुर्तिजापूर