शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Teacher's Day Special : आजीने शिकविले; शिक्षक अन् ग्रंथांनी घडविले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 10:24 IST

Teacher's Day Special : वडिलांना मी नेहमी म्हणायचो, मला खाऊ नको. मला विज्ञान साहित्य व ग्रंथ पाहिजे.

- संजय उमक ।लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : माझे बालपण आजीकडे अमरावतीच्या करजगावात गेले. शांताबाई चौधरी माझी आजी. ती शिक्षिका, तिने केलेल्या संस्कारांमुळे ती माझी पहिली गुरू, दुसऱ्या वर्गात मुरंबा या मूळ गावी राम मंदिराच्या पारावर शाळा भरत असे. चारही वर्गांना ‘गुलाबराव गुरुजी’ शिकवायचे.

गुलाबराव गुरुजी माझे आदर्श

गावात रस्त्याची सोय नसतानादेखील गुलाबराव गुरुजी चिखल तुडवत शाळेच्या वेळेत हजर असायचे. आम्हीसुद्धा त्यांची चातकासारखी वाट पाहत राहायचो. एखाद्या दिवशी गुरुजींना थोडा वेळ झाला तर आम्ही त्यांना गावच्या वेशीपर्यंत पाहायला जायचो. असे गुरू-शिष्याचे नाते दृढ झाले. गुलाबराव गुरुजी माझे आदर्श तर जगद्गुरू हे माझे प्रेरणास्रोत आहे.

वडिलांच्या श्रमाचे फलित करायचे हा संकल्पमूर्तिजापूरच्या गाडगे महाराज विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण करून अमरावती व्हीएमव्ही महाविद्यालयात प्रवेश घेतला. वडिलांचे शिक्षण बडोदा येथे झाल्याने त्यांनी मला बडोदा येथील सयाजीराव गायकवाड विद्यापीठात दाखल केले. अनेक मुलांसोबत वसतिगृहात राहताना वेगवेगळे कडू-गोड अनुभव आले.वडिलांच्या जीवावर मौजमजा करणारे विद्यार्थी बघितल्याने काळीज जळाले. मी तेव्हाच निर्णय घेतला वडिलांच्या श्रमाचे फलित करायचे आणि मला तिथून नवी दृष्टी मिळाली व शिक्षणाचे महत्त्व कळले. तोच माझ्या जीवनातला ‘टर्निंग पॉइंट’ ठरला.

अन् सुपर कॉम्प्युटर तयार केला...सुपर कॉम्प्युटर ‘महासंगणक’ बुद्धी, कौशल्य, आत्मविश्वासाच्या जोरावर सहकार्याच्या मदतीने दोन वर्षात जगासमोर आणला. हा संगणक केवळ अमेरिकेकडे होता. त्याचे पेटंट ते द्यायला तयार नव्हते. तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी जबाबदारी दिली. कधीही न पाहिलेला महासंगणक तयार करणे मोठे जिकिरीचे काम होते. तरीही ते आव्हान पेलले. तीन वर्षांचा कालावधी आम्हाला दिला तो कालावधी पूर्ण व्हायच्या अगोदर कमी खर्चात तो पूर्ण केला.खाऊ नाही ग्रंथच मागितलेवडील बाजारातून खाऊ आणायचे. वडिलांना मी नेहमी म्हणायचो, मला खाऊ नको. मला विज्ञान साहित्य व ग्रंथ पाहिजे. त्यानंतर वडील एकामागून एक विज्ञान साहित्य व ग्रंथ आणत गेले. त्या साहित्यातून व ग्रंथातून घरीच मोठी प्रयोगशाळा व ग्रंथालय उभे राहिले. या ग्रंथांनी जीवन घडविले.घरचे वातावरण, शिक्षण, पुस्तकांचे वाचन आणि संस्कार महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वत:मधील क्षमता व आत्मविश्वास जागृत होतो. तसेच चालून आलेल्या संधीचे सोने केले पाहिजे. - पद्मश्री डॉ़ विजय भटकर

 

टॅग्स :AkolaअकोलाTeachers Dayशिक्षक दिनMurtijapurमुर्तिजापूर