शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

‘टी.सी.’ झाली अनमोल, विद्यार्थ्यांचा लिलाव

By admin | Updated: May 12, 2015 01:36 IST

मतांसारखी मुलांच्या ‘टी.सी.’ची विक्री.

विवेक चांदूरकर / अकोला : महाराष्ट्र दिनी शाळांचे निकाल लागल्यानंतर शिक्षकांची विद्यार्थी मिळविण्यासाठी ह्यरेसह्ण सुरू झाली आहे. पटसंख्या नसली तर तुकड्याच बंद होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची चक्क खरेदी केली जात आहे. दुसरीकडे जास्त पैसे व सुविधा देणार्‍यांनाच शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) देण्याचा लिलाव पालकांच्यावतीने करण्यात येत आहे. विद्यार्थी मिळविणे हेच लक्ष्य असलेल्या शिक्षण संस्था व शिक्षकांकडून आमिषे दाखविण्यापासून ते साम, दाम, दंड भेदाचा वापर करण्यात येणार आहे. कॉन्व्हेंट शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल व शिक्षण अधिकाराच्या (आरटीई) बडग्यामुळे शिक्षण सम्राट हादरले आहेत. शिक्षकांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात आली. विद्यार्थी आणण्याचे टार्गेटच शिक्षकांना देण्यात आले असून, टार्गेट पूर्ण न करणार्‍यांच्या पगारात कपात करण्यात येते. हा खासगी संस्थाचालकांनी अलिखित नियम बनविला असून, शिक्षकांना वेठीस धरण्यात येत आहे. त्यामुळे कधीकाळी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आनंद उपभोगणारे शिक्षक आता मॅनेजमेंटने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करीत तापत्या उन्हात विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. प्राथमिक व माध्यमिक शाळांचा निकाल १ मे रोजी लागला. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम लागू झाल्याने इयत्ता १ ली ते ८ वी पयर्ंतचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण केले जाणार आहेत. इयत्ता पाचवीमध्ये कोणत्या गावातील किती विद्यार्थी आपल्या शाळेला मिळतील, याचा अंदाज घेऊन त्यांच्याशी संपर्क करण्यात येत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ९११ आणि खासगी प्राथमिक शाळा ३९0 आहेत. विविध आमिषे दाखवून शिक्षक, संस्थाचालक आणि विद्यार्थी पुरविण्याचे काम करणारे काही एजंट यांच्यामध्ये सध्या खलबते सुरू आहेत. शाळेत विद्यार्थी टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना विविध रूपात भेटवस्तू, रोख रक्कम देण्याची पाळी शिक्षकांवर आलेली आहे. परीक्षा संपल्याबरोबरच शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या शोधात वणवण भटकंती सुरू झाली आहे.