शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

टीबी मुक्त भारताचा ध्यास - डॉ. शिवहरी घोरपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:50 IST

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्या दृष्टिकोनातून सुधारीत राष्ट्रीय ...

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्या दृष्टिकोनातून सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २४ जानेवारीपासून क्षयरोग जनजागृती व क्षयरुग्ण विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने अधिष्ठाता तथा सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या स्टेट टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. शिवहरी घोरपडे यांच्याशी साधलेला संवाद...

क्षयरुग्णांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रणसाठी काय तयारी आहे?

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बिकानेर येथे ९ व १० जानेवारी रोजी नॅशनल टास्क फोर्सच्या वेर्स्टन झोनची बैठक होणार असून, यामध्ये महाराष्ट्रासह इतर पाच राज्यांचा सहभाग असेल. बैठकीनंतर २४ जानेवारीपासून राज्यासह जिल्ह्यात क्षयरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येईल.

क्षयरुग्ण शोध मोहिमेचे स्वरुप कसे असेल?

जिल्हा क्षयरोग तथा मनपा क्षयरोग विभागासोबतच प्रशिक्षणार्थी डॉक्टर व वैद्यकीय अधिकाºयांमार्फत शहरी व ग्रामीण भागात क्षयरुग्ण शोध मोहीम राबविली जाईल. सोबतच क्षयरोग संदर्भात जनजागृतीही केली जाईल. क्षयरुग्णांच्या शोध मोहिमेसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना विशेष ट्रेनिंग दिले जाणार असून, यामध्ये खासगी डॉक्टरांचाही समावेश असेल.

काय आहे मोहिमेचा उद्देश?

२०२५ पर्यंत भारताला क्षयरोग मुक्त करायचे आहे. त्या अनुषंगाने २४ जानेवारी ते २४ मार्च पर्यंत विशेष मोहीम राबविली जाईल. यामध्ये प्रामुख्याने नव्या आणि पुनरुपचारावरील क्षयरुग्णांना बरे करणे, रुग्ण शोधण्याचा दर वाढवणे, रेजिस्टंट क्षयरुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढविणे, खासगी रुग्णालयांमधील क्षयरोग सेवेची परिणामकारकता वाढविणे आदि प्रमुख उद्देश असणार आहे.

मोहिमेसाठी जिल्हास्तरावर काय तयारी केली आहे?

जिल्हा स्तरावर कोअर कमेटीची बैठक घेण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा क्षयरोग अधिकारी व मनपा क्षयरोग अधिकारी यांच्या सहकार्याने शहरी व ग्रामीण भागात क्षयरुग्ण शोध मोहिमेचा आराखडा आखण्यात येईल. ‘सीबीनॅट’ मशीनच्या माध्यमातून क्षयरोगाचे निदान केले जाणार असून, रुग्णांवर आवश्यकतेनुसार योग्य उपचाराची तयारी केली जात आहे.

क्षयरोग मुक्तीसाठी कशावर असणार विशेष भर ?

प्रत्येक क्षयरुग्णापर्यंत पोहोचण्यावर भर राहणार असून, १५ ते ४५ वर्ष वयोगटातील महिला व पुरुषांकडे विशेष लक्ष असणार आहे. शिवाय, समोर आलेल्या प्रत्येक क्षयरुग्णावर नियमीत उपचार करुन शंभर टक्के रुग्ण बरे होणे अपेक्षीत आहे. मोहीमेच्या यशस्वीतेसाठी कोअर कमेटीकडे विशेष लक्ष असणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय