शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

टीबी मुक्त भारताचा ध्यास - डॉ. शिवहरी घोरपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:50 IST

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्या दृष्टिकोनातून सुधारीत राष्ट्रीय ...

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्या दृष्टिकोनातून सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २४ जानेवारीपासून क्षयरोग जनजागृती व क्षयरुग्ण विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने अधिष्ठाता तथा सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या स्टेट टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. शिवहरी घोरपडे यांच्याशी साधलेला संवाद...

क्षयरुग्णांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रणसाठी काय तयारी आहे?

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बिकानेर येथे ९ व १० जानेवारी रोजी नॅशनल टास्क फोर्सच्या वेर्स्टन झोनची बैठक होणार असून, यामध्ये महाराष्ट्रासह इतर पाच राज्यांचा सहभाग असेल. बैठकीनंतर २४ जानेवारीपासून राज्यासह जिल्ह्यात क्षयरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येईल.

क्षयरुग्ण शोध मोहिमेचे स्वरुप कसे असेल?

जिल्हा क्षयरोग तथा मनपा क्षयरोग विभागासोबतच प्रशिक्षणार्थी डॉक्टर व वैद्यकीय अधिकाºयांमार्फत शहरी व ग्रामीण भागात क्षयरुग्ण शोध मोहीम राबविली जाईल. सोबतच क्षयरोग संदर्भात जनजागृतीही केली जाईल. क्षयरुग्णांच्या शोध मोहिमेसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना विशेष ट्रेनिंग दिले जाणार असून, यामध्ये खासगी डॉक्टरांचाही समावेश असेल.

काय आहे मोहिमेचा उद्देश?

२०२५ पर्यंत भारताला क्षयरोग मुक्त करायचे आहे. त्या अनुषंगाने २४ जानेवारी ते २४ मार्च पर्यंत विशेष मोहीम राबविली जाईल. यामध्ये प्रामुख्याने नव्या आणि पुनरुपचारावरील क्षयरुग्णांना बरे करणे, रुग्ण शोधण्याचा दर वाढवणे, रेजिस्टंट क्षयरुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढविणे, खासगी रुग्णालयांमधील क्षयरोग सेवेची परिणामकारकता वाढविणे आदि प्रमुख उद्देश असणार आहे.

मोहिमेसाठी जिल्हास्तरावर काय तयारी केली आहे?

जिल्हा स्तरावर कोअर कमेटीची बैठक घेण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा क्षयरोग अधिकारी व मनपा क्षयरोग अधिकारी यांच्या सहकार्याने शहरी व ग्रामीण भागात क्षयरुग्ण शोध मोहिमेचा आराखडा आखण्यात येईल. ‘सीबीनॅट’ मशीनच्या माध्यमातून क्षयरोगाचे निदान केले जाणार असून, रुग्णांवर आवश्यकतेनुसार योग्य उपचाराची तयारी केली जात आहे.

क्षयरोग मुक्तीसाठी कशावर असणार विशेष भर ?

प्रत्येक क्षयरुग्णापर्यंत पोहोचण्यावर भर राहणार असून, १५ ते ४५ वर्ष वयोगटातील महिला व पुरुषांकडे विशेष लक्ष असणार आहे. शिवाय, समोर आलेल्या प्रत्येक क्षयरुग्णावर नियमीत उपचार करुन शंभर टक्के रुग्ण बरे होणे अपेक्षीत आहे. मोहीमेच्या यशस्वीतेसाठी कोअर कमेटीकडे विशेष लक्ष असणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय