शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

लसीकरणाचे उद्दिष्ट ६० हजार साठा मात्र २५ हजारांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST

अकोला अकाेल्यातील काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लाॅकडाऊनच्या उपाययाेजनांसाेबतच लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळेच साेमवारी पालकमंत्री बच्चू कडू ...

अकोला अकाेल्यातील काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लाॅकडाऊनच्या उपाययाेजनांसाेबतच लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळेच साेमवारी पालकमंत्री बच्चू कडू यांनी व्यापाऱ्यांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिले. अवघ्या एका आठवडयात तब्बल ६० हजार व्यापाऱ्यांसह कामगारांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पालकमंत्र्यांनी दिले. मात्र, प्रत्यक्षात केवळ २५ हजार लसींचाच साठा उपलब्ध असल्याने, प्रशासनातील समन्वयाचा अभाव प्रकर्षाने जाणवला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियाेजन भवन येथे साेमवारी पालकमंत्री बच्चू कडू यांनी काेराेना उपाययाेजनांचा आढावा घेतला. यावेळी आमदार अमाेल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार, महापालीका आयुक्त निमा अराेरा, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक राजकुमार चव्हाण यांचेसह आराेग्य विभागाचे अधिकारी उपस्थित हाेते. केंद्र शासनाने ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्याबाबत सूचना दिल्या असल्याने व्यापाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. लसीकरणासाठी किराणा, भाजीपाला, फळ, औषधी, दूध िवक्रेते अशा पद्धतीने प्राधान्यक्रम निश्चित करा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी लसींच्या साठ्याबाबत जिल्हा समन्वय डाॅ.मनीष शर्मा यांनी उपलब्ध साठा आणि नगरपालिकांना केलेल्या पुरवठ्याबाबत माहिती दिली काेविन ॲपवर १४ हजार साठा अकाेल्यात असल्याचे दाखवत असले, तरी प्रत्यक्षात ३ हजारच डाेस उपलब्ध असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. त्यामुळे शहरात लसींचा साठा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.