शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

२७ गावांमध्ये पोहोचले नाही टँकरचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:36 IST

अकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१  गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश गत १३  दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी दिला; मात्र २0 ऑक्टोबरपर्यंत   ६१ पैकी ३४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात  आला असून, उर्वरित २७ गावांमध्ये अद्यापही टँकरचे पाणी  पोहोचलेच नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची  िपण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे.

ठळक मुद्देग्रामस्थ हैराण!६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१  गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश गत १३  दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी दिला; मात्र २0 ऑक्टोबरपर्यंत   ६१ पैकी ३४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात  आला असून, उर्वरित २७ गावांमध्ये अद्यापही टँकरचे पाणी  पोहोचलेच नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची  िपण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिन्यांचा  कालावधी उलटून गेला; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस झाला  नसल्याने, अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील  काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे  या धरणातील जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा  योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.  या पृष्ठभूमीवर खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ  दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु उन्नई  बंधार्‍यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद  करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये  जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त  ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचा आदेश  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी गत ७ सप्टेंबर  रोजी दिला. १३ दिवसांचा कालावधी उलटून जात आहे; मात्र  २0 सप्टेंबरपर्यंत ६१ पैकी ३४ गावांना २१ टँकरद्वारे  पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून, उर्वरित पाणीटंचाईग्रस्त  २७ गावांमध्ये अद्याप टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात  आला नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त या गावातील ग्रामस्थांची  िपण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.