लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश गत १३ दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्यांनी दिला; मात्र २0 ऑक्टोबरपर्यंत ६१ पैकी ३४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, उर्वरित २७ गावांमध्ये अद्यापही टँकरचे पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची िपण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसल्याने, अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे या धरणातील जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर खांबोराजवळील उन्नई बंधार्यातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु उन्नई बंधार्यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी गत ७ सप्टेंबर रोजी दिला. १३ दिवसांचा कालावधी उलटून जात आहे; मात्र २0 सप्टेंबरपर्यंत ६१ पैकी ३४ गावांना २१ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून, उर्वरित पाणीटंचाईग्रस्त २७ गावांमध्ये अद्याप टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त या गावातील ग्रामस्थांची िपण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.
२७ गावांमध्ये पोहोचले नाही टँकरचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:36 IST
अकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश गत १३ दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्यांनी दिला; मात्र २0 ऑक्टोबरपर्यंत ६१ पैकी ३४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, उर्वरित २७ गावांमध्ये अद्यापही टँकरचे पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची िपण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे.
२७ गावांमध्ये पोहोचले नाही टँकरचे पाणी
ठळक मुद्देग्रामस्थ हैराण!६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश