शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

२७ गावांमध्ये पोहोचले नाही टँकरचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:36 IST

अकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१  गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश गत १३  दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी दिला; मात्र २0 ऑक्टोबरपर्यंत   ६१ पैकी ३४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात  आला असून, उर्वरित २७ गावांमध्ये अद्यापही टँकरचे पाणी  पोहोचलेच नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची  िपण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे.

ठळक मुद्देग्रामस्थ हैराण!६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१  गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश गत १३  दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी दिला; मात्र २0 ऑक्टोबरपर्यंत   ६१ पैकी ३४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात  आला असून, उर्वरित २७ गावांमध्ये अद्यापही टँकरचे पाणी  पोहोचलेच नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची  िपण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिन्यांचा  कालावधी उलटून गेला; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस झाला  नसल्याने, अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील  काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे  या धरणातील जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा  योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.  या पृष्ठभूमीवर खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ  दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु उन्नई  बंधार्‍यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद  करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये  जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त  ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचा आदेश  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी गत ७ सप्टेंबर  रोजी दिला. १३ दिवसांचा कालावधी उलटून जात आहे; मात्र  २0 सप्टेंबरपर्यंत ६१ पैकी ३४ गावांना २१ टँकरद्वारे  पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून, उर्वरित पाणीटंचाईग्रस्त  २७ गावांमध्ये अद्याप टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात  आला नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त या गावातील ग्रामस्थांची  िपण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.