शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
3
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
4
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
5
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
6
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
7
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
8
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
9
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
10
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
11
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
12
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
13
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
14
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
15
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
16
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
17
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
18
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
19
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
20
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीकडे तालुक्याचे लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:17 IST

तेल्हारा: तालुक्यातील अडगाव ,तळेगांव व दानापूर या तीन जिल्हा परिषद व वाडी अदमपुर, अडगाव , हिवरखेड व भांबेरी या ...

तेल्हारा: तालुक्यातील अडगाव ,तळेगांव व दानापूर या तीन जिल्हा परिषद व वाडी अदमपुर, अडगाव , हिवरखेड व भांबेरी या चार पंचायत समितीच्या निवडणूकीची आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये काही विद्यमान सदस्यांना फटका बसणार असण्याची शक्यता आहे. मात्र इच्छुक उमेदवार सुध्दा आपले पत्ते उघडत नसल्याने वेट अँड वाचच्या भूमिकेत दिसत आहेत. दानापूर जिल्हा परिषद मतदारसंघ आता सर्वसाधारण निघाल्याने मतदारसंघात इच्छुकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

गेल्या वेळी वंचीत बहुजन आघाडीच्या मतांचे विभाजन झाले. त्यामुळे कमी मताने पराभूत भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने निवडणूक यावेळी सोपी नाही. असे बोलल्या जात आहे तर अडगाव जिप मतदार संघात गेल्या निवडणूक मध्ये वंचितच्या उमेदवार प्रमोदिनी कोल्हे यांनी हजारावर लीड कायम ठेवत विजय संपादन केला होता. त्याना आरक्षणाचा फारसा फटका बसणार नसून गेल्या वेळी त्यांच्या सोबत पंचायत समितीच्या सभापती यांना सुद्धा आरक्षणाचा फटका बसला नसल्याने येथील समीकरण फार काही जास्त बदलणार नाहीत. अशी चर्चा आहे. तळेगाव जिप सर्वसाधारण महिला निघाल्याने मध्ये आरक्षणाचा सुद्धा फारसा फरक पडला नसल्याने विजयी व पराभुत झालेले उमेदवार यावेळी पुन्हा या मतदारसंघात उभे राहण्याच्या तयारीत आहेत. काही घरी बसलेले पार्सल उमेदवारही या मतदारसंघात उडी घेऊ शकतात अशी चर्चा आहे. हिवरखेड पस मतदारसंघातुन निवडून आलेल्या सदस्य आज रोजी उपसभापती असून त्यांना जरी आरक्षणाचा फटका बसला नसला, तरी मात्र त्या केवळ सोळा मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यामुळेयावेळी सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्याने पराभूत किंवा इतर इच्छुक उमेदवारांची गर्दी होऊ शकते. वाडी अदमपुर पं. स. मतदारसंघ सर्वसाधारण निघाल्याने येथील वंचित उमेदवाराला अपक्ष उमेदवाराने गेल्यावेळी चांगली लढत दिली हाेती. कमी मताने पराभूत उमेदवार झालेले उमेदवार पुन्हार रिंगणात उभे राहुन समीकरण बिघडू शकतात तर भांबेरी पंचायत समिती मतदारसंघाचे आरक्षण सुध्दा सर्वसाधारण निघाले आहे. येथे सेनेचे उमेदवार सुद्धा कमी मताने पराभूत झाल्याने येथे सुद्धा इच्छुक उमेदवारांची संख्या वाढू शकते. त्यामुळे भाजपच्या उमेदवार समोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी आठ पैकी तीन जिल्हा परिषद व सतरापैकी चार जागांवर पंचायत समितीच्या निवडणूक होऊ घातल्याने यावेळी राजकीय नेते व पुढारी तसेच सहकार गटातील नेते मंडळींनी पुढाकार घेतल्याने, निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित.