शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

सावकारी कर्जमाफीसाठी आता तालुका, जिल्हास्तरीय समित्या

By admin | Updated: May 12, 2015 01:43 IST

तालुकास्तरावर प्रस्तावांची छाननी; जिल्हास्तरावर मंजुरी.

संतोष येलकर / अकोला : दुष्काळी परिस्थितीत राज्यातल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करण्यास राज्य शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार कर्जमाफीच्या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी आता तालुकास्तरीय समित्या आणि कर्जमाफीचे प्रस्ताव मंजूर करण्याकरिता जिल्हास्तरीय समित्या गठित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करून, शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील गेल्या हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यानंतर विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्‍यांनी अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले १५६.११ कोटी रुपयांचे कर्ज आणि त्यावरील व्याज, अशी एकूण १७१.३0 कोटी कर्जाची रक्कम शासनामार्फत संबंधित सावकारांना अदा करून, शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा निर्णय १0 एप्रिल २0१५ रोजी शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत घेण्यात आला. कर्जमाफीसाठी उपनिबंधक व साहाय्यक निबंधकांकडे (सहकारी संस्था) प्राप्त होणार्‍या प्रस्तावांची छाननी करण्याकरिता प्रत्येक तालुका स्तरावर तालुकास्तरीय समिती आणि तालुकास्तरीय समितीने छाननी करून शिफारस केलेल्या सावकारी कर्जमाफीच्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हास्तरीय समित्या गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कर्जमाफीच्या प्रस्तावांची छाननी आणि प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी जिल्हास्तरीय समित्या गठित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.