वाशिम, दि. १७- प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी गुरुवारपासून सामूहिक रजेवर जात असल्याने कामकाजात खोळंबा निर्माण झाला. अमरावती विभागासह राज्यातील सुमारे १५ हजार कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचा दावा महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे राज्य सरचिटणीस श्याम जोशी यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना केला.तलाठी व मंडळ अधिकार्यांच्या विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेळोवेळी निवेदने, धरणे आंदोलन करण्यात आले; मात्र शासनाने अद्याप या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे आंदोलन तीव्र करण्यात आल्याचे संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. शासन एकीकडे मंडळ अधिकारी स्तरावर ह्यवर्क स्टेशनह्ण निर्माण करण्याची घोषणा करते तर दुसरीकडे तेथे अत्यावश्यक व मूलभूत सुविधा पुरविण्याचा मुद्दा अस्पष्ट ठेवत असल्याने तलाठी व मंडळ अधिकार्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. ग्रामीण भागात ह्यनेट कनेक्टिव्हिटीह्ण व्यवस्थित नसल्याने, शेतकर्यांसह तलाठी व मंडळ अधिकार्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्यातील अनेक तलाठी व मंडळ अधिकार्यांना अद्यापपर्यंंत पिंट्रर्स व लॅपटॉप पुरविण्यात आले नाहीत. साजाची पुनर्रचना प्रलंबित आहे. यासह अन्य मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. २0१६ या वर्षात नव्याने तलाठी म्हणून नियुक्त झालेले कर्मचारी या संपात सहभागी नाहीत. उर्वरित सर्व तलाठी व मंडळ अधिकारी ह्यसामूहिक रजाह्ण आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा राज्य सरचिटणीस जोशी यांनी केला. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या व रब्बी हंगामाच्या काळात तलाठी व मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर गेल्याने कामकाजाचा खोळंबा होत आहे. गावपातळीवर शेतकर्यांसह सर्वांंनाच गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
तलाठी व मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर !
By admin | Updated: November 18, 2016 02:57 IST