शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शेतकरी न आल्यास तूर विक्रीचे टोकन रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:43 IST

अकोला : शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत सुरू असलेली तूर खरेदी ३१ ऑगस्टपर्यंत केली जात आहे. त्याचवेळी टोकन घेतलेले अनेक शेतकरी खरेदी केंद्रावर आलेले नाही. त्यामुळे टोकन घेतलेल्या सर्व शेतकर्‍यांनी १९ ऑगस्ट रोजी संबंधित कृषी बाजार समितीमध्ये उपस्थित राहून नोंद न केल्यास त्यांचे टोकन रद्द करण्याचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिला आहे. 

ठळक मुद्दे१९ ऑगस्ट रोजी कृउबासमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहनउपस्थित राहून नोंद न केल्यास त्यांचे टोकन रद्द करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत सुरू असलेली तूर खरेदी ३१ ऑगस्टपर्यंत केली जात आहे. त्याचवेळी टोकन घेतलेले अनेक शेतकरी खरेदी केंद्रावर आलेले नाही. त्यामुळे टोकन घेतलेल्या सर्व शेतकर्‍यांनी १९ ऑगस्ट रोजी संबंधित कृषी बाजार समितीमध्ये उपस्थित राहून नोंद न केल्यास त्यांचे टोकन रद्द करण्याचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिला आहे. बाजार समिती परिसर आणि घरी तूर पडून असलेल्या शेतकर्‍यांना विक्रीसाठी टोकन देण्यात आले आहे. त्या शेतकर्‍यांची तूर खरेदी सर्व केंद्रामध्ये सुरू आहे; मात्र काही केंद्रावर टोकन घेतलेले शेतकरी येत नसल्याचा प्रकार उघड होत आहे. त्यामुळे दैनंदिन नियोजन केल्याप्रमाणे खरेदी करणे शक्य नाही. शेतकरी केंद्रांवर येत नसल्यास त्यांनी तूर इतरत्र विक्री केली किंवा शासनाला देण्यास ते इच्छुक नाहीत. त्यातच ३१ ऑगस्टपर्यंत तूर खरेदी पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्यामुळे बाजार समितीमधून टोकन घेतलेले शेतकरी आहेत की नाहीत, घरी तूर असलेल्यांना विक्री करावयाची आहे की नाही, ही बाब पडताळून पाहिली जाणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना १९ ऑगस्ट रोजी बाजार समितीमध्ये उपस्थित राहून नोंद करणे आवश्यक करण्यात आले. त्या दिवशी उपस्थित राहणार्‍या शेतकर्‍यांचा तूर खरेदी दिवस निश्‍चित करण्याचे आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना देण्यात आले. बाजार समितीमध्ये येताना शेतकर्‍यांनी सात-बारा, टोकन, पंचनाम्याची प्रत तसेच इतर आवश्यक कागदपत्रे आणण्याचे आवाहन करण्यात आले. त्या दिवशी बाजार समितीमध्ये नोंद न करणार्‍या शेतकर्‍यांचे विक्री टोकन रद्द केले जाणार आहे.