शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाइन फ्लू’चा विळखा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:50 IST

अकोला : संपूर्ण राज्यभर धुमाकूळ घालणार्‍या स्वाइन फ्लू या अत्यंत घातक व संसर्गजन्य आजाराने जिल्हय़ातही प्रवेश केला असून, हळूहळू त्याचा विळखा घट्ट होत आहे. या आजाराचे आणखी तीन पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, त्यांच्यावर शहरातील दोन  खासगी इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८५ वर पोहचली आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूने जिल्हय़ात मार्च महिन्यापासून आतापर्यंत २0 जणांचे बळी घेतले आहेत. 

ठळक मुद्देआणखी तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले   खासगी रुग्णालयात उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संपूर्ण राज्यभर धुमाकूळ घालणार्‍या स्वाइन फ्लू या अत्यंत घातक व संसर्गजन्य आजाराने जिल्हय़ातही प्रवेश केला असून, हळूहळू त्याचा विळखा घट्ट होत आहे. या आजाराचे आणखी तीन पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, त्यांच्यावर शहरातील दोन  खासगी इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८५ वर पोहचली आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूने जिल्हय़ात मार्च महिन्यापासून आतापर्यंत २0 जणांचे बळी घेतले आहेत. स्वाइन फ्लू हा आजार  श्‍वसन यंत्रणेशी संबंधित असून, तो  एच १ एन १ या अत्यंत घातक विषाणूंमुळे होतो. हवेच्या माध्यमातून या विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे एका रुग्णापासून दुसर्‍याला या आजाराची लागण होते. या विषाणूंचा प्रसार रुग्णांच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम, त्याच्या थुंकीमधून होतो. अकोल्यात यावर्षी मार्च महिन्यात स्वाइन फ्लूचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. तेव्हापासून या आजाराने डोके वर काढले आहे. गत दोन दिवसांपूर्वी शहरातील दोन खासगी इस्पितळांमध्ये एक महिला व दोन पुरुष, अशा तिघांना स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आल्यानंतर दाखल करण्यात आले. त्यांच्या स्वॉबचे नमुने पॉझिटीव्ह आले असून, त्यांच्यावर टॅमी फ्लू उपचार सुरू करण्यात आले आहेत. 

पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ८५ वरमार्च ते सप्टेंबर २0१७ या कालावधीत १५0 संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ८५ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील ६२ रुग्ण एक तर बरे झाले आहेत किंवा त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वाइन फ्लूचा प्रसार झपाट्याने होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.