शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

शहरावर स्वाइन फ्लू, डेंग्यूचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:23 IST

अकोला : ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा पाऊस, तापमानात होणारा बदल आणि त्यात भरीस भर शहराच्या कानाकोपर्‍यात साचलेली घाण यामुळे शहरात साथ रोगांचा उद्रेक झाला आहे. खासगी रुग्णालयात दाखल झालेले स्वाइन फ्लू व डेंग्यूसदृश आजारांचे रुग्ण पाहता अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अकोलेकरांच्या आरोग्याची जबाबदारी असणार्‍या मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभाग व मलेरिया विभागाकडून नेमक्या कोणत्या उपाययोजना राबवल्या जात आहेत, यावर प्रशासनानेच अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. 

ठळक मुद्देमहापालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग, मलेरिया विभाग झोपेतस्लम एरियात सर्वाधिक रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा पाऊस, तापमानात होणारा बदल आणि त्यात भरीस भर शहराच्या कानाकोपर्‍यात साचलेली घाण यामुळे शहरात साथ रोगांचा उद्रेक झाला आहे. खासगी रुग्णालयात दाखल झालेले स्वाइन फ्लू व डेंग्यूसदृश आजारांचे रुग्ण पाहता अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अकोलेकरांच्या आरोग्याची जबाबदारी असणार्‍या मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभाग व मलेरिया विभागाकडून नेमक्या कोणत्या उपाययोजना राबवल्या जात आहेत, यावर प्रशासनानेच अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. दिवसभर कडाक्याचे तापणारे ऊन, त्यामुळे निर्माण होणारा उकाडा आणि सायंकाळ होताच थंडी अशा बदलामुळे शहरात ‘व्हायरल फिवर’ची साथ पसरली आहे. शहरात राबवल्या जाणार्‍या ‘स्वच्छता मोहिमे’चा आधार घेत सर्वत्र साफसफाईची कामे चोखपणे होत असल्याचा दावा महापालिका करीत आहे. परिस्थिती नेमकी उलटी आहे. मागील २0 दिवसांपासून शहरात नित्यनेमाने साफसफाई होत आहे. तरीसुद्धा साचलेली घाण व केरकचरा पाहता हा कचरा नेमका येतो कुठून, असा सवाल उपस्थित होतो. या सर्वांचा परिणाम अकोलेकरांच्या आरोग्यावर झाला असून, साथ रोगांमुळे शहरातील खासगी रुग्णालये रुग्णांमुळे ‘हाऊसफुल’ असल्याचे दिसत आहे. सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, घसा खवखवणे तसेच विषाणूजन्य रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातही लहान मुले,वयोवृद्ध नागरिकांच्या आजारी पडण्याचे प्रमाण मोठे आहे. काही खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लू व डेंग्यूसदृश आजारांचे रुग्ण दाखल झाले आहेत. यातील डेंग्यूच्या रुग्णांचे रक्ताचे नमुने ‘पॉझिटिव्ह’आढळले आहेत. वातावरणातील बदल अशा जीवघेण्या आजारांसाठी पोषक ठरतात. 

स्लम एरियात सर्वाधिक रुग्णशहरातील स्लम आणि झोपडपट्टी भागात साफसफाईच्या कामांचा बोजवारा उडाला असून, आरोग्य निरीक्षकांसह सफाई कर्मचार्‍यांना काहीही घेणे-देणे नसल्याचे दिसून येते. परिणामी या भागात संसर्गजन्य आजारांचा उद्रेक झाला असून, प्रत्येक घरातील एक रुग्ण तापाने फणफणत असल्याचे चित्र आहे. अशा भागात मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने व मलेरिया विभागाने तातडीने उपाययोजना राबवणे अपेक्षित असताना दोन्ही यंत्रणांचा कारभार कागदोपत्री सुरू असल्याची विदारक परिस्थिती आहे.

आयुक्त साहेब, याकडे लक्ष द्याल का?अकोलेकरांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांच्या वेतनावर वार्षिक कोट्यवधींचा खर्च होत असला तरी या विभागाचा कारभार कागदोपत्री सुरू आहे. किसनबाई भरतीया व कस्तुरबा गांधी रुग्णालयात कार्यरत संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांच्या कामकाजाचे कोणतेही मूल्यमापन किंवा आकस्मिक तपासणी होत नसल्यामुळे या विभागातील निर्ढावलेले बहुतांश अधिकारी-कर्मचारी कामावर हजर राहत नसल्याची माहिती आहे. या विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे आपसांत कमालीचे ‘ट्युनिंग’ आहे. लेखी स्वरूपात रजेचा अर्ज सादर न करता काही कर्मचारी कामावरून पळ काढत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारांकडे मनपा आयुक्त अजय लहाने लक्ष देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.