शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

स्वावलंबन योजनेतून खारपाणपट्टा वगळला; लाभार्थी निवड करतानाच दिला डच्चू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 14:05 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा क्रांती योजनेतून अमरावती विभागाच्या १६ तालुक्यांतील ९६० गावांतील हजारो लाभार्थींना निवड करतानाच वगळण्यात आले आहे.

अकोला : अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा क्रांती योजनेतून अमरावती विभागाच्या १६ तालुक्यांतील ९६० गावांतील हजारो लाभार्थींना निवड करतानाच वगळण्यात आले आहे. त्यामुळे या गावांतील शेतकºयांसाठी ही योजना हिरमोड करणारी ठरली आहे.अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकºयांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आली. योजनेतून शेतकºयांना प्राधान्याने विहिरीचा लाभ देय आहे. त्यासाठी अनुदानाची कमाल रक्कम २ लाख ८५ हजार रुपये आहे. त्यामध्ये नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, त्यासोबत वीज जोडणी, पंप संच, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचनासाठी शेतकºयांची निवड केली जाते. कृषी विभागाने चालू वर्षात २०१८-१९ मध्ये योजनेसाठी पात्र ठरलेल्या ११३९ अर्जांमधून २४१ लाभार्थींची निवड केली. त्यामध्ये अकोला तालुक्यातील ४८, अकोट-१८, बाळापूर-४६, बार्शीटाकळी-३४, मूर्तिजापूर-५१, पातूर-२२, तेल्हारा-२२ याप्रमाणे निवड करण्यात आली. बिरसा मुंडा क्रांती योजनेसाठी पात्र ठरलेल्या २७९ अर्जांमधून ५० लाभार्थींची निवड करण्यात आली. ही निवड करताना जिल्ह्यात पाच तालुक्यांत असलेल्या खारपाणपट्ट्यातील गावांतील लाभार्थींना सरसकट वगळण्यात आले आहे. सोबतच लगतच्या बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतही हाच प्रकार घडला आहे. अमरावती जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील गावेही खारपाणपट्ट्यात असल्याने तेथेही योजनेसाठी लाभार्थी निवड करणे अशक्य झाले. या १६ तालुक्यांतील हजारो लाभार्थींसाठी ही योजना हिरमोड करणारी ठरली आहे.

भूसवियं प्रमाणपत्रच देत नाही!तीन जिल्ह्यांतील १६ तालुके खारपाणपट्ट्याने व्यापले आहेत. या तालुक्यांतील ९६० गावांमध्ये विहिरी खोदण्यास भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून उद्दिष्ट दिले जात नाही, तसेच विहिरीतून सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल, असे प्रमाणपत्रही दिले जात नाही. त्यामुळे नव्या विशेष घटक योजनेत खारपाणपट्ट्यातील शेतकºयांना वंचित ठेवण्यात आले.

योजनेसाठी जिल्हानिहाय प्राप्त निधीयोजनेसाठी देण्यात आलेला निधी पाहता अकोला जिल्ह्यात तो अल्प आहे. अकोला- ६ कोटी, बुलडाणा-१५ कोटी ७५ लाख, वाशिम -१५ कोटी १५ लाख, अमरावती-११ कोटी ६८ लाख, यवतमाळ- ८ कोटी २६ लाख रुपये निधी देण्यात आला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना