शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

स्वावलंबन योजनेतून खारपाणपट्टा वगळला; लाभार्थी निवड करतानाच दिला डच्चू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 14:05 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा क्रांती योजनेतून अमरावती विभागाच्या १६ तालुक्यांतील ९६० गावांतील हजारो लाभार्थींना निवड करतानाच वगळण्यात आले आहे.

अकोला : अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा क्रांती योजनेतून अमरावती विभागाच्या १६ तालुक्यांतील ९६० गावांतील हजारो लाभार्थींना निवड करतानाच वगळण्यात आले आहे. त्यामुळे या गावांतील शेतकºयांसाठी ही योजना हिरमोड करणारी ठरली आहे.अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकºयांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आली. योजनेतून शेतकºयांना प्राधान्याने विहिरीचा लाभ देय आहे. त्यासाठी अनुदानाची कमाल रक्कम २ लाख ८५ हजार रुपये आहे. त्यामध्ये नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, त्यासोबत वीज जोडणी, पंप संच, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचनासाठी शेतकºयांची निवड केली जाते. कृषी विभागाने चालू वर्षात २०१८-१९ मध्ये योजनेसाठी पात्र ठरलेल्या ११३९ अर्जांमधून २४१ लाभार्थींची निवड केली. त्यामध्ये अकोला तालुक्यातील ४८, अकोट-१८, बाळापूर-४६, बार्शीटाकळी-३४, मूर्तिजापूर-५१, पातूर-२२, तेल्हारा-२२ याप्रमाणे निवड करण्यात आली. बिरसा मुंडा क्रांती योजनेसाठी पात्र ठरलेल्या २७९ अर्जांमधून ५० लाभार्थींची निवड करण्यात आली. ही निवड करताना जिल्ह्यात पाच तालुक्यांत असलेल्या खारपाणपट्ट्यातील गावांतील लाभार्थींना सरसकट वगळण्यात आले आहे. सोबतच लगतच्या बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतही हाच प्रकार घडला आहे. अमरावती जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील गावेही खारपाणपट्ट्यात असल्याने तेथेही योजनेसाठी लाभार्थी निवड करणे अशक्य झाले. या १६ तालुक्यांतील हजारो लाभार्थींसाठी ही योजना हिरमोड करणारी ठरली आहे.

भूसवियं प्रमाणपत्रच देत नाही!तीन जिल्ह्यांतील १६ तालुके खारपाणपट्ट्याने व्यापले आहेत. या तालुक्यांतील ९६० गावांमध्ये विहिरी खोदण्यास भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून उद्दिष्ट दिले जात नाही, तसेच विहिरीतून सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल, असे प्रमाणपत्रही दिले जात नाही. त्यामुळे नव्या विशेष घटक योजनेत खारपाणपट्ट्यातील शेतकºयांना वंचित ठेवण्यात आले.

योजनेसाठी जिल्हानिहाय प्राप्त निधीयोजनेसाठी देण्यात आलेला निधी पाहता अकोला जिल्ह्यात तो अल्प आहे. अकोला- ६ कोटी, बुलडाणा-१५ कोटी ७५ लाख, वाशिम -१५ कोटी १५ लाख, अमरावती-११ कोटी ६८ लाख, यवतमाळ- ८ कोटी २६ लाख रुपये निधी देण्यात आला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना