शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

रानडुकरांचा धुमाकूळ; तीन एकरातील मूग भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:24 IST

नया अंदुरा : परिसरातील पहिल्याच पावसात शेतकऱ्यांनी नगदी पीक मुगाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली असून, त्यानंतर दमदार पावसामुळे पिके ...

नया अंदुरा : परिसरातील पहिल्याच पावसात शेतकऱ्यांनी नगदी पीक मुगाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली असून, त्यानंतर दमदार पावसामुळे पिके बहरली आहेत. मात्र बहरलेल्या पिकांवर वन्यप्राणी ताव मारीत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. येथील अल्पभूधारक शेतकरी कांतीलाल रामलाल गुप्ता व चंपालाल रामलाल गुप्ता यांच्या कारंजा रमजानपूर शेतशिवारातील शेतात रानडुकरांनी व हरणांच्या कळपांनी हैदोस करून तीन एकरातील मूग भुईसपाट करून नुकसान केले आहे .

यंदा कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी आर्थिक संकटात आहेत. शेतकऱ्याने कर्ज काढून खते, बी-बियाणे विकत आणून पेरणी केली. पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. त्यानंतर अतिपावसामुळे पिकांचे नुकसान झाले. सद्यस्थितीत पिके बहरलेली व शेंगा धारण अवस्थेत असताना वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला आहे. येथील शेतकरी कांतीलाल गुप्ता, चंपालाल गुप्ता यांच्या तीन एकरातील पिकाचे रानडुकराने मोठे नुकसान केले. वनविभागाने, कृषी सहायक व तलाठी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

--------------------------

रात्री द्यावी लागते गस्त

शेतशिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला आहे. रात्रीच्या सुमारास शेतात जाऊन पिकांची नासाडी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी रात्री स्वत:चा जीव धोक्यात टाकून जागरण करून पिकाचे रक्षण करीत आहेत. त्यामुळे वनविभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

-----------------------

वन्यप्राण्यांच्या धुमाकुळामुळे तीन एकर मूग पीक शेंगा अवस्थेत असताना रानडुकरामुळे अतोनात नुकसान झाल्याने आर्थिक संकट कोसळले आहे. वनविभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा.

- कांतीलाल गुप्ता, शेतकरी, नया अंदुरा