शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाडेगावातील रास्त भाव दुकानाचा परवाना निलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 13:38 IST

बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील माजी सरपंच आसिफ खान यांच्या रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित करण्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी सोमवारी दिला. रास्त भाव दुकानदार यांच्या तपासणीमध्ये गहू कमी आढळून येणे व तांदूळ जास्त आढळून आल्याप्रकरणी दोषी ठरवत धान्याची अफरातफर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. आसिफ खान मुस्तफा खान यांची चौकशी मेहकर पोलिसांनी केल्यानंतर त्यांच्या दुकानाची तपासणी करण्यात आली होती.

ठळक मुद्देआसिफ खान यांच्या दुकानातील धान्याची अफरातफर प्रकरण

अकोला - बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील माजी सरपंच आसिफ खान यांच्या रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित करण्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी सोमवारी दिला. रास्त भाव दुकानदार यांच्या तपासणीमध्ये गहू कमी आढळून येणे व तांदूळ जास्त आढळून आल्याप्रकरणी दोषी ठरवत धान्याची अफरातफर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. आसिफ खान मुस्तफा खान यांची चौकशी मेहकर पोलिसांनी केल्यानंतर त्यांच्या दुकानाची तपासणी करण्यात आली होती.बुलडाणा जिल्ह्यात धान्याचा काळाबाजार झाल्यानंतर मेहकर पोलिसांनी गव्हासह अन्नधान्याचा एक ट्रक काळाबाजारात धान्य नेत असताना पकडला होता. या प्रकरणी वाडेगाव येथील आसिफ खान मुस्तफा खान यांची चौकशी मेहकर पोलिसांनी केली होती. त्याचा आधार घेत जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी आसिफ खान यांच्या वाडेगाव येथील रास्त भाव दुकानाची तपासणी करण्याचा आदेश बाळापूर तहसीलदारांना दिला होता. या आदेशावरून जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे चौकशी अहवाल सादर करण्यात आला होता. दोषारोपाच्या आधारे परवान्याविरुद्ध कारवाई करण्यात येऊ नये, असे आसिफ खान यांनी लेखी स्पष्टीकरण पुरवठा अधिकाºयांना दिले होते. मात्र पुरवठा अधिकाºयांनी शिधावस्तूंचे वाटप पारदर्शी न झाल्याची तसेच धान्याची अफरातफर झाल्याचा संशय व्यक्त केला होता. पुरवठा अधिकाºयांनी दिलेल्या आदेशात म्हटले, की वाडेगाव येथील दुकानाचे प्राधिकारपत्र पुढील चौकशीपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. रास्त भाव दुकानदार यांनी सप्टेंबर महिन्यात किती अन्नधान्याची उचल केली व किती धान्याचे वाटप शिधापत्रिकाधारकांना केले, याबाबत २५ टक्के शिधापत्रिकाधारकांचे बयान आता चौकशीदरम्यान तहसीलदारांना घ्यावे लागणार आहे. एक महिन्याच्या आत पुरवठा अधिकाºयांना अहवाल सादर करावा लागणार आहे. तसेच शिधापत्रिकाधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून रास्त भाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिका नजिकच्या रास्त भाव दुकानास जोडण्याचे आदेशात नमूद आहे.