आकोट : विधानसभेत लक्षवेधी सूचनेदरम्यान सोयाबीनच्या बियाण्यांचा काळाबाजार करणारे व निकृष्ट दर्जाचे बियाणे विक्री करणार्यांचे परवाने निलंबीत करण्यात यावे तसेच त्यांना संरक्षण देणार्या अधिकार्यांवरसुद्धा कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय गावंडे यांनी केली. अकोला जिल्ह्यातील आकोट भागात सोयाबीनचे पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. परंतु अतिपावसामुळे बियाणे खराब झाले आहे. दुसरीकडे शेतकर्यांची मागणी लक्षात घेता मोठय़ा प्रमाणावर काळा बाजार सुरू असलयाचे लक्षात येत आहे. या बाबीचा फायदा घेऊन निकृष्ट बियाणे विकत घेमन काही व्यापारी सदर बियाणे विकत आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी माल विकण्यापूर्वीच संबंधित दुकानदाराजवळून सॅम्पल घेऊन तपासणी करून शेतकर्यांचे नुकसान टाळावे, असेही आमदार गावंडे म्हणाले. यशोमती ठाकूर यांनी शेतकर्यांसाठी हेल्पलाइन सुरू करावी, यावर बालताना आमदार गावंडे म्हणाले की, कृषी विभागाच्या कार्यालयात चपराशी वगळता लिपिकापासून तर अधिकार्यांपर्यंत कुणीही हजर नसतात. त्यामुळे जागृत शेतकर्यांनी हेलपाटे घेऊन कर्मचार्यांची भेट होत नाही, असा प्रश्न आमदार गावंडे यांनी उपस्थित केला. जिप्समची मागणी नाही, असे काही अधिकारी सांगतात तर काही मागणी असुनही वरिष्ठ पुरवठा करीत नाहीत, असे उत्तर देतात. अशा प्रकारे आमदार गावंडे यांनी शेतकर्यांच्या बियाणे व आदी विविध पैलुंवर प्रकाश टाकीत सरकारचे लक्ष वेधले. (तालुका प्रतिनिधी)
काळाबाजार करणार्या बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित करा
By admin | Updated: June 8, 2014 00:45 IST