शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

सोयाबीन वाचविण्यासाठी धावपळ!

By admin | Updated: October 27, 2014 01:33 IST

दुस-या दिवशीही अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस

अकोला: जिल्ह्यात दुसर्‍या दिवशीही (रविवारी) ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाने हजेरी लावल्याच्या स्थितीत कापणीला आलेल्या आणि कापणीनंतर शेतात गंजी लावलेल्या सोयाबीनचे पीक वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे. शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस झाला. रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी आणि खरीप हंगामातील कपाशी पिकासाठी हा अवकाळी रिमझिम पाऊस उपयुक्त असल्याचे मानले जाते. दुसर्‍या दिवशी म्हणजेच रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते, अधून-मधून अवकाळी रिमझिम पाऊसही सुरू होता. पावसाच्या या वातावरणात शेतात कापणीला आलेले सोयाबीन आणि कापणी झालेल्या शेतातील सोयाबीनचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने का पणीनंतर शेतातच लावण्यात आलेल्या सोयाबीनच्या गंज्या पावसामुळे भिजू नयेत, यासाठी सोयाबीनच्या गंजीवर ताडपत्री टाकून, पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांची सर्वत्र लगबग सुरू असल्याचे दिसत आहे. आधीच यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अल्प पावसामुळे मूग, उडिदाचे पीक हातून गेले असताना, सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली आहे. एकरी ५0 किलो ते एक क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होत असल्याने शे तकरी हवालदिल झाला आहे. त्यातच आता ढगाळ व पावसाच्या वातावरणात हाताशी आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यानुषंगाने पावसाच्या वातावरणात सोयाबीन पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.