शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यात निकृष्ट शालेय पोषण आहाराचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:12 IST

मूर्तिजापूर : लॉकडाऊनपासून तालुक्यातील संपूर्ण शाळा बंद होत्या. दरम्यान, अलीकडे शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून विद्यार्थ्यांना नियमित ...

मूर्तिजापूर : लॉकडाऊनपासून तालुक्यातील संपूर्ण शाळा बंद होत्या. दरम्यान, अलीकडे शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून विद्यार्थ्यांना नियमित शालेय पोषण आहार पुरविण्याचे नियोजनाचाही समावेश आहे. परंतू विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारातील धान्य अत्यंत निकृष्ट व माती सिमेंट मिश्रित निघाल्याची धक्कादायक माहिती बुधवारी समोर आली आहे.

शालेय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यातील शालेय पोषण आहाराची महत्त्वाची योजना आतापर्यंत मुख्याध्यापकांनी व शालेय पोषण अधीक्षकांसाठी सध्या आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरत आहे, गत १ जानेवारी दरम्यान शालेय पोषण आहाराचा कोटा पुरविण्यात आला आहे. परंतु माना रेल्वे स्टेशनवरील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करीत असताना, त्यात चक्क सिमेंट मिश्रित (भेसळयुक्त) तांदूळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. शालेय पोषण आहाराचे वाटप करते वेळी मुख्याध्यापकाच्या लक्षात आल्याने त्यांनी, ही बाब शालेय पोषण आहार अधीक्षक पंचायत समिती मूर्तिजापूर यांच्या लगेच लक्षात आणून दिली. त्यांनीही त्या बदल्यात दुसरे तांदूळ पाठविण्याचेही कबूल केले. तरी विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारा पोषण आहार निकृष्ट व भेसळयुक्त येतोच कसा, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. भारतीय खाद्य निगम कंपनीकडून मिळणारा शालेय पोषण आहारातील खाद्यपदार्थ आशुतोष ट्रेडर्स, अकोला या पुरवठादारा मार्फत पुरविले गेले आहेत. भेसळयुक्त धान्य पुरवठा करून विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्या पुरवठादारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शालेय पोषण आहाराच्या नावाखाली प्रचंड उधळपट्टी होत असून योग्य तो पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. तांदूळ व कडधान्य वगळता हिरव्या पालेभाज्या व इतर भाज्यांचा रोज जेवणात समावेश असावा. यासाठी राज्यामध्ये शालेय पोषण आहार ही योजना इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येते. विद्यार्थ्यांमागे मिळणारे पहिली ते पाचवी ४ रुपये १३ पैसे, सहावी ते आठवी ६ रुपये ५८ पैसे हे थेट मुख्याध्यापकाच्या घशात जात असल्याने, त्यात शालेय पोषण आहार संबधित अधिकाऱ्यांना मोठे कमिशन असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हिरव्या पालेभाज्या, बटाटे, कोबी यासारख्या भाज्यांचा शालेय पोषण आहाराच्या माध्यान्ह भोजनात समावेश असणे सक्तीचे असताना या भाज्यांचा आहारात अनेक शाळांमध्ये वापर होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. एवढेच नव्हे तर आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना (बुधवारी) केळी, अंडी, बिस्किटे देण्याची सक्ती असताना तालुक्यातील अनेक शाळेत या आहाराचे वाटपच होत नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यात मराठी व उर्दू माध्यमाच्या (इंग्रजी शाळा वगळून) एकूण १९३ शाळा असून यामधील ७ शाळा विना अनुदानित आहेत. या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात येत नाही.

विद्यार्थी म्हणतात, बिस्किटे, अंडी, केळी मिळतच नाहीत

या संदर्भात तालुक्यातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना विचारणा केली असता आमच्या शाळेत आम्ही कधी बिस्किटे, अंडी, केळी बघितलीच नाहीत. एखाद्या वेळेस प्रत्येकी चार बिस्किटे मिळतात. हिरव्या भाजीपाल्याचा समावेशही अधूनमधून असतो.

माना येथील शाळेतील शालेय पोषण आहाराच्या तांदळाचे कट्टे सिमेंट मिश्रित (भेसळयुक्त) असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले, सदर भेसळयुक्त तांदूळ बदलून देण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या आहेत.

मनोज गवई, शालेय पोषण आहार अधीक्षक, पं. स. मूर्तिजापूर