शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

अंदाजपत्रकात अडकली ‘सुकळी’ योजना

By admin | Updated: March 7, 2016 02:37 IST

६४ गावांमध्ये पाणीप्रश्न गंभीर; १५ ते २0 दिवसांआड पाणीपुरवठा.

अकोला: जिल्ह्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना १५ ते २0 दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने, या गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. सुकळी येथील तलावातून या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेच्या अंदाजपत्रकास मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत (मजीप्रा) तांत्रिक मान्यता मिळणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे तांत्रिक मान्यतेत अडकलेली योजना केव्हा मार्गी लागणार आणि ग्रामस्थांना पिण्याचे पाणी केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खारपाणपट्टय़ातल्या जिल्ह्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु, यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने महान येथील काटेपूर्णा धरणात उपलब्ध अत्यल्प जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी राखीव करण्यात आला. गत सप्टेंबरपासून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना सुकळी येथील तलावातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला; मात्र सुकळी तलाव ते खांबोरा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी कमी व्यासाची असल्याने, योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे ६४ गावांना १५ ते २0 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असून, या भागात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पृष्ठभूमीवर खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना सुकळी तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी सुकळी तलाव ते खांबोरा येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन जलवाहिनी टाकणे व पाण्याची उचल करण्यासाठी नवीन पंप बसविण्यासाठी १२ कोटी ४0 लाख रुपयांच्या योजनेचे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आलेले अंदाजपत्रक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे तांत्रिक मान्यतेसाठी महिनाभरापूर्वी सादर करण्यात आले. परंतु, या योजनेच्या अंदाजपत्रकास अद्याप तांत्रिक मान्यता प्राप्त झाली नाही. मजीप्राच्या तांत्रिक मान्यतेनंतर या योजनेला शासनाकडून मान्यता घ्यावी लागणार नाही. त्यामुळे अंदाजपत्रकात अडकलेली योजना केव्हा मार्गी लागणार आणि टंचाईग्रस्त ६४ गावांमधील ग्रामस्थांना पुरेसे पिण्याचे पाणी केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.