शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

..तर ८३ कुटुंबांवर येणार आत्महत्येची वेळ!

By admin | Updated: November 6, 2014 23:03 IST

अकोला कृषी विद्यापीठ प्रशासनाच्या नकारात्मक भूमिकेचे कर्मचारी ठरले बळी

अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सोयीनुसार अर्थ लावून ८३ कर्मचार्‍यांच्या बडतर्फीचे आदेश काढणार्‍या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रशासनाच्या नकारात्मक भूमिकेमुळे या कर्मचार्‍यांसह त्यांच्या कुटुंबीयांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सहा महिन्यांत कोणतीही कार्यवाही न करणार्‍या प्रशासनाने बडतर्फीचे आदेश मात्र तडकाफडकी काढल्याने प्रशासनाच्या एकूण भूमिकेवरच संशय व्यक्त होत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नोकरभरती प्रक्रि येत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ८३ कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले. हा आदेश काढताना कर्मचार्‍यांची बाजूच विद्यापीठ प्रशासनाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाची अंमलबजावणी न करता, दुसर्‍या आदेशाचा सोयीचा अर्थ काढून कर्मचार्‍यांच्या कारकिर्दीवर नांगर फिरविण्याचे काम कृषी विद्यापीठ प्रशासनाने केले. कृषी विद्यापीठाच्या भरतिप्रक्रियेबाबत तक्रारी झाल्यानंतर या प्रकरणाची रीतसर चौकशी करण्यात आली. त्यात प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवल्याचा ठपका समितीने ठेवला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने कर्मचार्‍यांच्या विरोधात निर्णय दिला. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने कर्मचार्‍यांना दिलासा देताना कृषी विद्यापीठाला भरतिप्रक्रिया नव्याने राबवून या कर्मचार्‍यांना त्यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा आदेश पारित केला. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातच भरतिप्रक्रिया राबविण्यासाठी दिलेला दुसरा पर्याय विद्यापीठाला हाताळता आला असता. कृषी विद्यापीठ प्रशासनाने भरतिप्रक्रियेत झालेल्या चुका लपविण्यासाठी आणि अधिकार्‍यांचा बचाव करण्यासाठी कर्मचार्‍यांचा बळी घेतला.