शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST

अकोला: गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पूरक पोषण आहारातून तेल गायब झाले असून, त्याऐवजी आता साखर दिली जात आहे. ...

अकोला: गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पूरक पोषण आहारातून तेल गायब झाले असून, त्याऐवजी आता साखर दिली जात आहे. तेलाच्या वाढत्या भावामुळे शासनाकडून ही काटकसर करण्यात येत असली, तरी या निर्णयाबाबत जिल्ह्यातील लाभार्थींमधून नाराजी व्यक्त होत आहे.

लहानपणापासूनच बालके सुदृढ व्हावी व कुपोषण कमी करण्याच्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातून पूरक पोषण आहार योजना राबविली जात आहे. महाराष्ट्रात लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे. जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कोविड १९ काळात यामध्ये काही अडथळे येत असले, तरीही अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्यामार्फत लाभार्थींपर्यंत विविध खाद्यान्न पोहोचविले जात आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पूरक पोषण आहारातून खाद्यतेल गायब झाले आहे. त्याऐवजी साखर दिली जात आहे. तेलाच्या भावात मोठी वाढ झाली असून, प्रतिकिलो दीडशेपेक्षा जास्त भाव आहे. याउलट साखरेचे भाव स्थिर असून, साखर ३६ रुपये प्रतिकिलोप्रमाणे मिळत आहे. यामुळे शासनाच्या वतीने पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखरेचे वाटप करून, खर्चात कपात करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या निर्णयामुळे लाभार्थींमध्ये रोष व्यक्त होत आहे.

---------------------------

पूरक पोषण आहारात काय काय मिळते?

- ६ महिने ते ३ वर्षे वयोगटांतील लाभार्थ्यांना गहू २,८०० ग्रॅम,

- चवळी १,५०० ग्रॅम

- मसूर १,५०० ग्रॅम या व्यतिरिक्त इतर गटातील लाभार्थींना चणा, हळद, मीठ, मिरची पावडर आदींचे वितरण केले जाते.

---------------------------

पुरक पोषण आहार योजनेंतर्गत जिल्ह्यात सद्यस्थितीत १६,४५१ लाभार्थींना घरपोच पूरक पोषण आहाराचे वितरण करण्यात येते. प्रत्येक लाभार्थींना योजनेचा लाभ मिळेल, यासाठी आमचा प्रयत्न असतो. पूरक पोषण आहारामध्ये यापूर्वी खाद्यतेल देण्यात येत होते. मात्र, आता त्याऐवजी साखर वाटप करण्यात येत आहे.

-विलास मरसाळे,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जि.प. अकोला.

----------------------------

कोरोनाच्या संकट काळात अनेक जण आर्थिक संकटात आहेत. अशातच शासनाने तेल देणे सुरूच ठेवणे गरजेचे आहे. तेलासह साखर दिल्यास कोविड काळात गरीब, गरजूंना त्याचा लाभ होईल.

- ........

--------------------------

शासनाने तेलाऐवजी साखर देण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. महागाई वाढत चाललेली असताना, सरकारची ही काटकसर कशासाठी सुरू आहे.

- ...............

----------------------------------

शासनाची पोषक आहार योजना ही खरोखरच कौतुकास्पद आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरळीत होत आहे. मात्र, या योजनेतील दिले जाणारे घटक वाढविण्याऐवजी कमी करणे ही सरकारची लाभार्थींप्रतिची भूमिका योग्य नाही.

-..................

--------------------------------------

पूरक पोषक आहार योजनेचे एकूण लाभार्थी- ६९,४६०

सहा महिने ते ३ वर्षे वयोगटांतील लाभार्थी- ५३,००९

जिल्ह्यातील एकूण गरोदर महिला- ८,८६०

जिल्ह्यातील एकूण स्तनदा माता- ७,५९१