शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
4
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
5
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
6
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
7
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
8
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
9
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
10
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
11
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
12
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
13
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
14
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
15
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
16
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
17
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
18
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
19
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
20
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST

अकोला: गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पूरक पोषण आहारातून तेल गायब झाले असून, त्याऐवजी आता साखर दिली जात आहे. ...

अकोला: गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पूरक पोषण आहारातून तेल गायब झाले असून, त्याऐवजी आता साखर दिली जात आहे. तेलाच्या वाढत्या भावामुळे शासनाकडून ही काटकसर करण्यात येत असली, तरी या निर्णयाबाबत जिल्ह्यातील लाभार्थींमधून नाराजी व्यक्त होत आहे.

लहानपणापासूनच बालके सुदृढ व्हावी व कुपोषण कमी करण्याच्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातून पूरक पोषण आहार योजना राबविली जात आहे. महाराष्ट्रात लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे. जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कोविड १९ काळात यामध्ये काही अडथळे येत असले, तरीही अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्यामार्फत लाभार्थींपर्यंत विविध खाद्यान्न पोहोचविले जात आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पूरक पोषण आहारातून खाद्यतेल गायब झाले आहे. त्याऐवजी साखर दिली जात आहे. तेलाच्या भावात मोठी वाढ झाली असून, प्रतिकिलो दीडशेपेक्षा जास्त भाव आहे. याउलट साखरेचे भाव स्थिर असून, साखर ३६ रुपये प्रतिकिलोप्रमाणे मिळत आहे. यामुळे शासनाच्या वतीने पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखरेचे वाटप करून, खर्चात कपात करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या निर्णयामुळे लाभार्थींमध्ये रोष व्यक्त होत आहे.

---------------------------

पूरक पोषण आहारात काय काय मिळते?

- ६ महिने ते ३ वर्षे वयोगटांतील लाभार्थ्यांना गहू २,८०० ग्रॅम,

- चवळी १,५०० ग्रॅम

- मसूर १,५०० ग्रॅम या व्यतिरिक्त इतर गटातील लाभार्थींना चणा, हळद, मीठ, मिरची पावडर आदींचे वितरण केले जाते.

---------------------------

पुरक पोषण आहार योजनेंतर्गत जिल्ह्यात सद्यस्थितीत १६,४५१ लाभार्थींना घरपोच पूरक पोषण आहाराचे वितरण करण्यात येते. प्रत्येक लाभार्थींना योजनेचा लाभ मिळेल, यासाठी आमचा प्रयत्न असतो. पूरक पोषण आहारामध्ये यापूर्वी खाद्यतेल देण्यात येत होते. मात्र, आता त्याऐवजी साखर वाटप करण्यात येत आहे.

-विलास मरसाळे,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जि.प. अकोला.

----------------------------

कोरोनाच्या संकट काळात अनेक जण आर्थिक संकटात आहेत. अशातच शासनाने तेल देणे सुरूच ठेवणे गरजेचे आहे. तेलासह साखर दिल्यास कोविड काळात गरीब, गरजूंना त्याचा लाभ होईल.

- ........

--------------------------

शासनाने तेलाऐवजी साखर देण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. महागाई वाढत चाललेली असताना, सरकारची ही काटकसर कशासाठी सुरू आहे.

- ...............

----------------------------------

शासनाची पोषक आहार योजना ही खरोखरच कौतुकास्पद आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरळीत होत आहे. मात्र, या योजनेतील दिले जाणारे घटक वाढविण्याऐवजी कमी करणे ही सरकारची लाभार्थींप्रतिची भूमिका योग्य नाही.

-..................

--------------------------------------

पूरक पोषक आहार योजनेचे एकूण लाभार्थी- ६९,४६०

सहा महिने ते ३ वर्षे वयोगटांतील लाभार्थी- ५३,००९

जिल्ह्यातील एकूण गरोदर महिला- ८,८६०

जिल्ह्यातील एकूण स्तनदा माता- ७,५९१