शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST

अकोला: गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पूरक पोषण आहारातून तेल गायब झाले असून, त्याऐवजी आता साखर दिली जात आहे. ...

अकोला: गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पूरक पोषण आहारातून तेल गायब झाले असून, त्याऐवजी आता साखर दिली जात आहे. तेलाच्या वाढत्या भावामुळे शासनाकडून ही काटकसर करण्यात येत असली, तरी या निर्णयाबाबत जिल्ह्यातील लाभार्थींमधून नाराजी व्यक्त होत आहे.

लहानपणापासूनच बालके सुदृढ व्हावी व कुपोषण कमी करण्याच्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातून पूरक पोषण आहार योजना राबविली जात आहे. महाराष्ट्रात लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे. जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कोविड १९ काळात यामध्ये काही अडथळे येत असले, तरीही अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्यामार्फत लाभार्थींपर्यंत विविध खाद्यान्न पोहोचविले जात आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पूरक पोषण आहारातून खाद्यतेल गायब झाले आहे. त्याऐवजी साखर दिली जात आहे. तेलाच्या भावात मोठी वाढ झाली असून, प्रतिकिलो दीडशेपेक्षा जास्त भाव आहे. याउलट साखरेचे भाव स्थिर असून, साखर ३६ रुपये प्रतिकिलोप्रमाणे मिळत आहे. यामुळे शासनाच्या वतीने पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखरेचे वाटप करून, खर्चात कपात करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या निर्णयामुळे लाभार्थींमध्ये रोष व्यक्त होत आहे.

---------------------------

पूरक पोषण आहारात काय काय मिळते?

- ६ महिने ते ३ वर्षे वयोगटांतील लाभार्थ्यांना गहू २,८०० ग्रॅम,

- चवळी १,५०० ग्रॅम

- मसूर १,५०० ग्रॅम या व्यतिरिक्त इतर गटातील लाभार्थींना चणा, हळद, मीठ, मिरची पावडर आदींचे वितरण केले जाते.

---------------------------

पुरक पोषण आहार योजनेंतर्गत जिल्ह्यात सद्यस्थितीत १६,४५१ लाभार्थींना घरपोच पूरक पोषण आहाराचे वितरण करण्यात येते. प्रत्येक लाभार्थींना योजनेचा लाभ मिळेल, यासाठी आमचा प्रयत्न असतो. पूरक पोषण आहारामध्ये यापूर्वी खाद्यतेल देण्यात येत होते. मात्र, आता त्याऐवजी साखर वाटप करण्यात येत आहे.

-विलास मरसाळे,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जि.प. अकोला.

----------------------------

कोरोनाच्या संकट काळात अनेक जण आर्थिक संकटात आहेत. अशातच शासनाने तेल देणे सुरूच ठेवणे गरजेचे आहे. तेलासह साखर दिल्यास कोविड काळात गरीब, गरजूंना त्याचा लाभ होईल.

- ........

--------------------------

शासनाने तेलाऐवजी साखर देण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. महागाई वाढत चाललेली असताना, सरकारची ही काटकसर कशासाठी सुरू आहे.

- ...............

----------------------------------

शासनाची पोषक आहार योजना ही खरोखरच कौतुकास्पद आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरळीत होत आहे. मात्र, या योजनेतील दिले जाणारे घटक वाढविण्याऐवजी कमी करणे ही सरकारची लाभार्थींप्रतिची भूमिका योग्य नाही.

-..................

--------------------------------------

पूरक पोषक आहार योजनेचे एकूण लाभार्थी- ६९,४६०

सहा महिने ते ३ वर्षे वयोगटांतील लाभार्थी- ५३,००९

जिल्ह्यातील एकूण गरोदर महिला- ८,८६०

जिल्ह्यातील एकूण स्तनदा माता- ७,५९१