शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
4
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
5
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
6
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
7
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
8
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
9
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
10
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
11
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
12
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
13
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
14
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
15
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
16
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
17
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
18
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
19
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
20
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

मुबलक वीज, तरीही कृषी पंपांना रात्रीचा पुरवठा

By atul.jaiswal | Updated: August 12, 2017 18:17 IST

अकोला : राज्यात सध्या गरजेपेक्षा अधिक वीज उपलब्ध असतानाही शेतकºयांच्या कृषी पंपांना मात्र रात्री वीज पुरवठा केला जात आहे. आठवड्यातून चार दिवस रात्री व तीन दिवस दिवसा, असे वीज पुरवठ्याचे वेळापत्रक असल्याने शेतकºयांना रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून सिंचन करावे लागत आहे. त्यामुळे कृषी पंपांना आठवड्यातील सातही दिवस दिवसालाच वीज ...

ठळक मुद्देशेतकरी करताहेत रात्रीचे सिंचन : दिवसा वीज देण्याची मागणी

अकोला : राज्यात सध्या गरजेपेक्षा अधिक वीज उपलब्ध असतानाही शेतकºयांच्या कृषी पंपांना मात्र रात्री वीज पुरवठा केला जात आहे. आठवड्यातून चार दिवस रात्री व तीन दिवस दिवसा, असे वीज पुरवठ्याचे वेळापत्रक असल्याने शेतकºयांना रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून सिंचन करावे लागत आहे. त्यामुळे कृषी पंपांना आठवड्यातील सातही दिवस दिवसालाच वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.राज्यात सध्या वीज उत्पादनाची स्थिती सुधारली आहे. मागणी व पुरवठा यामधील तफावत दूर झाल्यामुळे राज्यात पुरेशी वीज उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. खुद्द ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज्यात पुरेशी वीज उपलब्ध असल्याचे कबूल केले आहे. राज्यात जर पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असेल, तर शेतकºयांच्या कृषी पंपांना आठवडाभर दिवसाच वीज पुरवठा का केला जात नाही, असा प्रश्न शेतकºयांमधून उपस्थित होत आहे.अकोला जिल्ह्याकडे यावर्षी पावसाने पाठ फिरविली आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेल्यानंतरही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी पिके वाचविण्यासाठी सिंचनाचा आधार घेत आहेत. सध्या जिल्ह्यातील शेतकºयांना रात्री १० तास तर दिवसा आठ तास, असा वीज पुरवठा केला जातो. यातील चार दिवस रात्री तर तीन दिवस दिवसा, असे वीज पुरवठ्याचे वेळापत्रक आहे. हे वेळापत्रक सतत बदलत राहते. रात्रीच्या वेळी सिंचन करताना शेतकºयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वन्य प्राणी, सरपटणारे प्राणी यांचा धोका कायम शेतकºयांच्या मानगुटीवर राहतो. त्यामुळे शेतकºयांना आठवड्यातील सातही दिवस दिवसालाच वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.

वेळापत्रक वीज नियामक आयोगाच्या निकषांनुसारयासंदर्भात महावितरणच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता, कृषी पंपांसाठी वीज पुरवठ्याचे निकष महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने ठरवून दिला आहे. या निकषानुसार कृषी पंपांना वीज पुरवठा केला जातो, असे अधिकाºयांनी सांगितले.