शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मुबलक वीज, तरीही कृषी पंपांना रात्रीचा पुरवठा

By atul.jaiswal | Updated: August 12, 2017 18:17 IST

अकोला : राज्यात सध्या गरजेपेक्षा अधिक वीज उपलब्ध असतानाही शेतकºयांच्या कृषी पंपांना मात्र रात्री वीज पुरवठा केला जात आहे. आठवड्यातून चार दिवस रात्री व तीन दिवस दिवसा, असे वीज पुरवठ्याचे वेळापत्रक असल्याने शेतकºयांना रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून सिंचन करावे लागत आहे. त्यामुळे कृषी पंपांना आठवड्यातील सातही दिवस दिवसालाच वीज ...

ठळक मुद्देशेतकरी करताहेत रात्रीचे सिंचन : दिवसा वीज देण्याची मागणी

अकोला : राज्यात सध्या गरजेपेक्षा अधिक वीज उपलब्ध असतानाही शेतकºयांच्या कृषी पंपांना मात्र रात्री वीज पुरवठा केला जात आहे. आठवड्यातून चार दिवस रात्री व तीन दिवस दिवसा, असे वीज पुरवठ्याचे वेळापत्रक असल्याने शेतकºयांना रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून सिंचन करावे लागत आहे. त्यामुळे कृषी पंपांना आठवड्यातील सातही दिवस दिवसालाच वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.राज्यात सध्या वीज उत्पादनाची स्थिती सुधारली आहे. मागणी व पुरवठा यामधील तफावत दूर झाल्यामुळे राज्यात पुरेशी वीज उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. खुद्द ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज्यात पुरेशी वीज उपलब्ध असल्याचे कबूल केले आहे. राज्यात जर पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असेल, तर शेतकºयांच्या कृषी पंपांना आठवडाभर दिवसाच वीज पुरवठा का केला जात नाही, असा प्रश्न शेतकºयांमधून उपस्थित होत आहे.अकोला जिल्ह्याकडे यावर्षी पावसाने पाठ फिरविली आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेल्यानंतरही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी पिके वाचविण्यासाठी सिंचनाचा आधार घेत आहेत. सध्या जिल्ह्यातील शेतकºयांना रात्री १० तास तर दिवसा आठ तास, असा वीज पुरवठा केला जातो. यातील चार दिवस रात्री तर तीन दिवस दिवसा, असे वीज पुरवठ्याचे वेळापत्रक आहे. हे वेळापत्रक सतत बदलत राहते. रात्रीच्या वेळी सिंचन करताना शेतकºयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वन्य प्राणी, सरपटणारे प्राणी यांचा धोका कायम शेतकºयांच्या मानगुटीवर राहतो. त्यामुळे शेतकºयांना आठवड्यातील सातही दिवस दिवसालाच वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.

वेळापत्रक वीज नियामक आयोगाच्या निकषांनुसारयासंदर्भात महावितरणच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता, कृषी पंपांसाठी वीज पुरवठ्याचे निकष महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने ठरवून दिला आहे. या निकषानुसार कृषी पंपांना वीज पुरवठा केला जातो, असे अधिकाºयांनी सांगितले.