शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा

By admin | Updated: March 14, 2015 23:55 IST

बुलडाणा येथे वीज पडल्याने विजेच्या उपकरणांचे नुकसान.

बुलडाणा : जिल्ह्यात शुक्रवारच्या रात्री विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाल्यामुळे गहू, हरभरा, मका व इतर रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. बुलडाणा शहर परिसरातील केशव नगरात वीज पडून नारळाचे झाड जळाले असून, अनेकांच्या घरातील टीव्ही व विजेची उपकरणे जळाली आहेत. जिल्ह्यात आठ दिवसातून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे काय करावे, असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पडला आहे. गतवर्षी झालेल्या अतवृष्टी व गारपिटीने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले होते, तर यावर्षी अत्यल्प पावसाने खरिप पिकाचे नुकसान केले आहे. या संकटाचा सामना करीत असंख्य शेतकर्‍यांनी रब्बीची पेरणी केली; परंतु ही पिके काढणीच्या बेतात असतानाच गारपिटीसह अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना हैरान करून सोडले आहे. आठ दिवसातून एकवेळा तरी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या दहा तारखेला जिल्ह्याच्या बहुतांश भागाला अवकाळी पावसासह गारपिटीने तडाखा दिला होता.त्यानंतर पुन्हा १ मार्चला जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. नंतर तीन दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती. एवढय़ावरच समाधान न झालेल्या निसर्गाने पुन्हा काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात करून दिली.