शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

अवकाळी पावसाचा कहर सुरूच

By admin | Updated: March 15, 2015 01:26 IST

फळबागा, पिकांचे नुकसान.

अकोला: गत आठ दिवसांपासून जिल्हय़ात अवकाळी पाऊस सुरू आहे. शुक्रवारी रात्री जिल्हय़ात विजेच्या कडकडाटांसह पुन्हा जोरदार पाऊस कोसळला. यामुळे फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठय़ाप्रमाणावर नुकसान झाले आहे.२८ फेब्रुवारीपासून जिल्हय़ात अवकाळी पाऊस सुरू आहे. २८ फेब्रुवारी रोजी १३५.0८ मिमी तर १ मार्च रोजी १0३.६ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतर १0 मार्च रोजी आणखी ११ मिमी पाऊस पडला. ११ मार्च रोजी २२.८0 मिमी पाऊस पडला. दोन दिवसांच्या दडीनंतर पुन्हा शुक्रवारी रात्री ७ मिमी पाऊस पडला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. तसेच सुसाट्याचा वाराही सुटला होता. त्यामुळे ग्रामीण भागात काही ठिकाणी झाडे पडली. शुक्रवारी रात्री आकोटमध्ये १४ मिमी, उमरा येथे १६ मिमी, अकोलखेड येथे १५.७ मिमी पाऊस पडला. तसेच उगवा येथे ७ मिमी, आगर येथे ६ मिमी पाऊस पडला. तेल्हारा तालुक्यात १९ मिमी पाऊस पडला. पाथर्डी येथे ४ मिमी, हिवरखेड येथे ५ मिमी, माळेगाव येथे ४ तर पंचगव्हाण येथे ५ मिमी पाऊस पडला. वार्‍यामुळे काही गावांमध्ये झाडे पडली. या पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या शेतामध्ये गहू व हरभरा पीक आहे. ही पिके सध्या काढणीला आली आहेत. अनेक शेतकर्‍यांनी शेतामध्ये पिके काढून ठेवली. मात्र, बाजार समितीत विक्री करण्यापूर्वीच पावसामुळे शेतमाल भिजला. परिणामी भिजलेल्या मालाची विक्रीही कमी भावात करावी लागत आहे.