शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

अवकाळी पावसाचा कहर सुरूच

By admin | Updated: March 15, 2015 01:26 IST

फळबागा, पिकांचे नुकसान.

अकोला: गत आठ दिवसांपासून जिल्हय़ात अवकाळी पाऊस सुरू आहे. शुक्रवारी रात्री जिल्हय़ात विजेच्या कडकडाटांसह पुन्हा जोरदार पाऊस कोसळला. यामुळे फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठय़ाप्रमाणावर नुकसान झाले आहे.२८ फेब्रुवारीपासून जिल्हय़ात अवकाळी पाऊस सुरू आहे. २८ फेब्रुवारी रोजी १३५.0८ मिमी तर १ मार्च रोजी १0३.६ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतर १0 मार्च रोजी आणखी ११ मिमी पाऊस पडला. ११ मार्च रोजी २२.८0 मिमी पाऊस पडला. दोन दिवसांच्या दडीनंतर पुन्हा शुक्रवारी रात्री ७ मिमी पाऊस पडला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. तसेच सुसाट्याचा वाराही सुटला होता. त्यामुळे ग्रामीण भागात काही ठिकाणी झाडे पडली. शुक्रवारी रात्री आकोटमध्ये १४ मिमी, उमरा येथे १६ मिमी, अकोलखेड येथे १५.७ मिमी पाऊस पडला. तसेच उगवा येथे ७ मिमी, आगर येथे ६ मिमी पाऊस पडला. तेल्हारा तालुक्यात १९ मिमी पाऊस पडला. पाथर्डी येथे ४ मिमी, हिवरखेड येथे ५ मिमी, माळेगाव येथे ४ तर पंचगव्हाण येथे ५ मिमी पाऊस पडला. वार्‍यामुळे काही गावांमध्ये झाडे पडली. या पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या शेतामध्ये गहू व हरभरा पीक आहे. ही पिके सध्या काढणीला आली आहेत. अनेक शेतकर्‍यांनी शेतामध्ये पिके काढून ठेवली. मात्र, बाजार समितीत विक्री करण्यापूर्वीच पावसामुळे शेतमाल भिजला. परिणामी भिजलेल्या मालाची विक्रीही कमी भावात करावी लागत आहे.