शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीसह वीज पुरवठ्याच्या कामांचे प्रस्ताव सादर करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:19 IST

अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. ...

अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील विविध भागात रस्ते खराब झाले असून, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. त्या अनुषंगाने जिल्ह्यात तातडीने करावयाच्या रस्ते दुरुस्तीसह वीज पुरवठ्याच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून, संंबंधित तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे दुरुस्तीच्या कामांचे प्रस्ताव खर्चाच्या अंदाजपत्रकासह मंगळवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अ. अ. गणोरकर, महावितरणचे पवनकुमार कछोट, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, मजिप्राचे एन.एम राठोड, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए. ए. खान, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच जिल्हयातील तहसीलदार, गटविकास अधिकारी आदी संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

संपर्क तुटलेल्या गावांतील कामे प्राधान्याने हाती घ्या!

जिल्ह्यातील तालुकानिहाय नुकसानीचा आढावा यावेळी घेण्यात आला. दुरुस्ती कामांच्या प्रस्तावात अत्यंत आवश्यक असलेल्या कामांचा समावेश करुन, जिथे गावांचा संपर्क तुटला आहे तेथील कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. वीजपुरवठा सुरळीत करुन, राष्ट्रीय महामार्गालगत नुकसान संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संपर्क साधून त्यांच्याकडून दुरुस्तीची कामे करुन घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

दळणवळण सुरु करण्यासाठी डागडुजी, दुरुस्तीची कामे करा!

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागात तातडीने दळणवळण सुरु करता यावे ,यासाठी आवश्यक ती डागडुजी व दुरुस्तीची कामे सुरु करुन, करावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी ठरवावा. तसेच जी कामे अन्य विभागांच्या निधीतून होतील किंवा अन्य योजनांमधून होऊ शकतील, त्या कामांचा समावेश या तातडीच्या कामांमध्ये करु नये,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

फोटो: