शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीसह वीज पुरवठ्याच्या कामांचे प्रस्ताव सादर करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:19 IST

अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. ...

अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील विविध भागात रस्ते खराब झाले असून, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. त्या अनुषंगाने जिल्ह्यात तातडीने करावयाच्या रस्ते दुरुस्तीसह वीज पुरवठ्याच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून, संंबंधित तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे दुरुस्तीच्या कामांचे प्रस्ताव खर्चाच्या अंदाजपत्रकासह मंगळवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अ. अ. गणोरकर, महावितरणचे पवनकुमार कछोट, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, मजिप्राचे एन.एम राठोड, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए. ए. खान, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच जिल्हयातील तहसीलदार, गटविकास अधिकारी आदी संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

संपर्क तुटलेल्या गावांतील कामे प्राधान्याने हाती घ्या!

जिल्ह्यातील तालुकानिहाय नुकसानीचा आढावा यावेळी घेण्यात आला. दुरुस्ती कामांच्या प्रस्तावात अत्यंत आवश्यक असलेल्या कामांचा समावेश करुन, जिथे गावांचा संपर्क तुटला आहे तेथील कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. वीजपुरवठा सुरळीत करुन, राष्ट्रीय महामार्गालगत नुकसान संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संपर्क साधून त्यांच्याकडून दुरुस्तीची कामे करुन घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

दळणवळण सुरु करण्यासाठी डागडुजी, दुरुस्तीची कामे करा!

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागात तातडीने दळणवळण सुरु करता यावे ,यासाठी आवश्यक ती डागडुजी व दुरुस्तीची कामे सुरु करुन, करावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी ठरवावा. तसेच जी कामे अन्य विभागांच्या निधीतून होतील किंवा अन्य योजनांमधून होऊ शकतील, त्या कामांचा समावेश या तातडीच्या कामांमध्ये करु नये,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

फोटो: