शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

पंदेकृवि विभाजनाचा मुद्दा अधांतरी!

By admin | Updated: January 25, 2016 02:05 IST

बी. वेंकटेश्‍वरलू अभ्यास समितीचा अहवाल सादर; शासन संसाधने व इतर साधने तपासणार.

राजरत्न सिरसाट/अकोला: अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख व महात्मा जोतिबा फुले राहुरी कृषी विद्यापीठ विभाजनाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या डॉ. बी. वेंकटेस्वरलू अभ्यास समितीने शासनाला अहवाल सादर केल्यांनतर या दोन्ही कृषी विद्यापीठांच्या विभाजनासंदर्भातील चर्चेला वेग आला आहे. दरम्यान, शासन कृषी विद्यापीठासाठी लागणारे संसाधने व इतर आवश्यक बाबी तपासणार आहे.विदर्भातील एकमेव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाजन करू न पूर्व विदर्भात नवे कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासंदर्भात तत्कालीन आघाडी शासनाने डॉ. वायपीएस थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीचे गठन केले होते. या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला होता. तथापि, सत्ता बदल झाल्यानंतर युती शासनाने नव्याने कृषी विद्यापीठ विभाजन समिती स्थापन केली. स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेस्वरलू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या अभ्यास समितीने आपला अहवाल ३१ डिसेंबर रोजी शासनाला सादर केला आहे. त्यानंतर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, या कृषी विद्यापीठात विभाजनाच्या चर्चेने जोर धरला आहे. १५ जानेवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा निकाली निघेल ही चर्चादेखील होती; परंतु कृषी विद्यापीठाचे विभाजन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागत असल्याने सध्यातरी कृषी विद्यापीठाचे विभाजन अशक्य असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.दरम्यान, कृषी विद्यापीठाच्या विभाजनाचा अहवाल वेंकटेस्वरलू समितीने दिला असला तरी या विद्यापीठाच्या विभाजनाला या कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व विदर्भातील इतर तज्ज्ञांचा विरोध आहे. नागपूर विद्यापीठाचे विभाजन करू न नव्याने निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाला जागा नसून, बुलडाण्याच्या मॉडेल कॉलेजचे प्रकरण असेच आहे. विद्यापीठ निर्मिती करणे म्हणजे मोठा खर्चाचा भाग आहे. शासनाकडे सध्या पैसा नाही तर कृषी विद्यापीठाचे विभाजन करणार कसे, असा प्रश्न या निमित्ताने तज्ज्ञाक डून उपस्थित केला जात आहे. दहा लाख हेक्टरच्या आत क्षेत्र असलेल्या भागाला स्वतंत्र विद्यापीठ देणे सोयीस्कर आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.