शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पंदेकृवि विभाजनाचा मुद्दा अधांतरी!

By admin | Updated: January 25, 2016 02:05 IST

बी. वेंकटेश्‍वरलू अभ्यास समितीचा अहवाल सादर; शासन संसाधने व इतर साधने तपासणार.

राजरत्न सिरसाट/अकोला: अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख व महात्मा जोतिबा फुले राहुरी कृषी विद्यापीठ विभाजनाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या डॉ. बी. वेंकटेस्वरलू अभ्यास समितीने शासनाला अहवाल सादर केल्यांनतर या दोन्ही कृषी विद्यापीठांच्या विभाजनासंदर्भातील चर्चेला वेग आला आहे. दरम्यान, शासन कृषी विद्यापीठासाठी लागणारे संसाधने व इतर आवश्यक बाबी तपासणार आहे.विदर्भातील एकमेव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाजन करू न पूर्व विदर्भात नवे कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासंदर्भात तत्कालीन आघाडी शासनाने डॉ. वायपीएस थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीचे गठन केले होते. या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला होता. तथापि, सत्ता बदल झाल्यानंतर युती शासनाने नव्याने कृषी विद्यापीठ विभाजन समिती स्थापन केली. स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेस्वरलू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या अभ्यास समितीने आपला अहवाल ३१ डिसेंबर रोजी शासनाला सादर केला आहे. त्यानंतर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, या कृषी विद्यापीठात विभाजनाच्या चर्चेने जोर धरला आहे. १५ जानेवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा निकाली निघेल ही चर्चादेखील होती; परंतु कृषी विद्यापीठाचे विभाजन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागत असल्याने सध्यातरी कृषी विद्यापीठाचे विभाजन अशक्य असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.दरम्यान, कृषी विद्यापीठाच्या विभाजनाचा अहवाल वेंकटेस्वरलू समितीने दिला असला तरी या विद्यापीठाच्या विभाजनाला या कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व विदर्भातील इतर तज्ज्ञांचा विरोध आहे. नागपूर विद्यापीठाचे विभाजन करू न नव्याने निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाला जागा नसून, बुलडाण्याच्या मॉडेल कॉलेजचे प्रकरण असेच आहे. विद्यापीठ निर्मिती करणे म्हणजे मोठा खर्चाचा भाग आहे. शासनाकडे सध्या पैसा नाही तर कृषी विद्यापीठाचे विभाजन करणार कसे, असा प्रश्न या निमित्ताने तज्ज्ञाक डून उपस्थित केला जात आहे. दहा लाख हेक्टरच्या आत क्षेत्र असलेल्या भागाला स्वतंत्र विद्यापीठ देणे सोयीस्कर आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.