शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:31 IST

रोहणखेड: ग्रामीण भागातील जि.प. प्राथमिक मराठी शाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला; मात्र अद्यापही शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाही. मागील वर्षी शाळेमध्ये मिळालेले जुने गणवेश विद्यार्थी शाळेमध्ये घालून जात आहे. १५ ऑगस्ट यायला केवळ ७ दिवसच बाकी राहिले असून, जुन्याच गणवेशावर विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देनव्या अटींमुळे विद्यार्थ्यांना फटका अनुदानासाठी आता आईचेही खाते क्रमांक लागणार

लोकमत न्यूज नेटवर्करोहणखेड: ग्रामीण भागातील जि.प. प्राथमिक मराठी शाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला; मात्र अद्यापही शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाही. मागील वर्षी शाळेमध्ये मिळालेले जुने गणवेश विद्यार्थी शाळेमध्ये घालून जात आहे. १५ ऑगस्ट यायला केवळ ७ दिवसच बाकी राहिले असून, जुन्याच गणवेशावर विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.मागील वर्षी शासनाने शाळा उघडल्यानंतर १५ दिवसातच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले होते; मात्र यावर्षी शाळा सुरू होऊन दीड महिना झाला; मात्र अद्यापही गणवेश वाटप झाले नसून, यामुळे पालक त्रस्त झाले आहेत. यावर्षी शासनाच्या भोंगळ कारभारामुळे सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या मोफत गणवेश विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी चारशे रुपये दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील १४७ प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी ११ हजार ८२ एवढे लाभार्थी संख्य़ा आहे. या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ४४ लाख ३२ हजार ८00 रुपये शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संयुक्त बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे; परंतु यावर्षी शासनाच्या उदासीन धोरणामुळे पालकांना फारच हेलपाटे द्यावे लागत आहे. या अगोदर काही विद्यार्थ्यांंनी स्वत: खाते उघडले काही पालकांनी झीरो बॅलन्सवर खाते उघडले; परंतु पालकांनी काढलेले खाते पूर्ण व्यर्थ गेले आता शासनाने नवीन नियम काढला आता विद्यार्थ्यांना बँकेत खाते काढण्यासाठी विद्यार्थ्यांंना आईचे खाते काढावे लागणार तसेच पालकांना दुकानामध्ये दोन गणवेश चारशे रुपयात घेऊन त्यानंतर दोन गणवेशासाठी मुख्याध्यापक पैसे काढण्यासाठी चेक देतील; परंतु सध्या ग्रामीण भागात पंधरा दिवसांपासून पाऊस नाही. कोवळी पिके पावसाअभावी सुकू लागली आहेत. तसेच मजुरांना शेतात कामे नाही. मजूर घरीच बसला आहे. हातालाच काम नसल्याने पोट भरावे की विद्यार्थ्यांंना गणवेश आणावा, असे पालकांमध्ये बोलल्या जात आहे. तसेच तालुक्यातील अनेक शाळांमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांंनी आईचे खातेसुद्धा उघडले नाही. त्यामुळे अजूनही ८0 टक्के विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. तरी वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देऊन विद्यार्थ्यांंना शाळेतच गणवेश वाटप करावे, अशी मागणी होत आहे.  

तालुक्यातील विद्यार्थ्यांंच्या बँक खात्यात गणवेशासाठी निधी जमा करण्यात आला असून, अनेक पालकांनी बँक खातेसुद्धा काढले नाही. शासनाच्या आदेशानुसार गणवेशाची अनुदानाची रक्कम व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा करता येत नाही. - संदीप मालवे, गटशिक्षणाधिकारी, अकोट

 शालेय गणवेश घेण्यासाठी आम्ही पालकांना बँकेत खाते काढण्याच्या सूचना दिल्या तर काही पालकांनी खाते काढले; परंतु आता पुन्हा आईचे खाते काढण्यासाठी पालकांना सूचना दिल्या आहेत. - संदीप व्यक्ते, प्रभारी मुख्याध्यापक, रोहणखेड