शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

विद्यार्थ्यांच्या ‘आनापान वर्गा’ची शिक्षकांकडून दखलच नाही

By admin | Updated: April 16, 2015 01:40 IST

शिक्षकांची प्रशिक्षणापासून पळवाट, मित्र उपक्रम फसला.

प्रवीण खेते / अकोला: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील शाळांमध्ये ह्यआनापान वर्गह्ण चालविण्यात येतात. त्या अनुषंगाने मित्र उपक्रमाच्या साहाय्याने शाळेतील शिक्षकांना दरवर्षी प्रशिक्षण दिले जाते. परंतु, प्रशिक्षणासाठी १२ दिवस कुटुंबापासून दूर राहावे लागत असल्याने जिल्ह्यासह राज्यातील शिक्षकांनी आनापान वर्गाच्या प्रशिक्षण वर्गापासून पळवाट काढल्याचे समोर आले आहे. समाजामध्ये जलद गतीने पसरत असलेल्या वाईट विचारसरणीला कुठेतरी अंकुश लावता यावा, यासाठी मुलांमध्ये विद्यार्थीदशेत असतानाच सदाचाराची भावना निर्माण होणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा सर्व शाळांमध्ये ह्यआनापान वर्गह्ण सुरू करण्यात आले आहे. या वर्गाद्वारे देशातील भावी पिढी निर्माण व्हावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण, मौन पाळणे, ध्यान लावणे यासोबतच वाईट विचारसरणीचा त्याग करण्याची शिकवण दिल्या जाते. विद्यार्थीदशेत मुलांमध्ये चांगले विचार शिक्षकच रुजवू शकतो. म्हणून ह्यमाइंड इन ट्रेनिंग फोर राईट अवेअरनेसह्ण म्हणजेच मित्र उपक्रमाद्वारे शिक्षकांना दरवर्षी प्रशिक्षण दिल्या जाते. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील तेल्हारा तालुकास्थित खापरखेडा फाट्यावरील ह्यधम्मा अनाकुला विपश्यना साधना केंद्रह्णची निवड करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण केंद्र अकोला, वाशिम व जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांसाठी आहे. या केंद्रामध्ये प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या शिक्षकांना १२ दिवस प्रशिक्षण दिल्या जाते. या प्रशिक्षण काळात शिक्षकाला समाजापासून अलिप्त राहावे लागते. त्यामुळे शैक्षणिक सत्र २0१४ -१५ मध्ये निवड झालेल्या शिक्षकांनी प्रशिक्षणापासून पळवाटा काढल्याचे दिसून आले. परिणामी सर्वांगीण विकास साधणार्‍या आनापान वर्गापासून विद्यार्थी वंचित राहिले आहेत. शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वावरदेखील या प्रशिक्षणाचा चांगला परिणाम झाला असता; परंतु शासनाच्या चांगल्या उपक्रमाचा नेहमीच फज्जा उडविल्या जातो. याचेच एक उदाहरण म्हणून आपण फसलेल्या मित्र उपक्रमाचे देऊ शकतो. *काय आहे आनापान वर्ग?आनापान वर्गाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना श्‍वास घेणे व सोडण्याची प्रक्रिया करायला लावतात. दहा मिनिटांच्या या प्रक्रियेनंतर मन शांती होऊन मन एकाग्र होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, मानसिक व वैचारिक प्राबल्य निर्माण होते. आपसातील मतभेद, मानसिक अस्थिरता, चंचलपणा, वाईट विचार नष्ट होतात. तसेच विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमता वाढून परीक्षेची भीतीदेखील कमी होते.

*संभाव्य अनुचित प्रकार टाळता येतातविद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांमध्येही वाईट विचार येऊ नयेत, सर्वांमध्ये मैत्रीची भावना निर्माण व्हावी तसेच अश्लील विचारांवर अंकुश राहावा, या अनुषंगाने सर्वच शाळांमध्ये मैत्री उपक्रमांतर्गत ह्यआनापान वर्गह्ण राबविण्याचा उद्देश होता; परंतु शैक्षणिक सत्र २0१४-१५ मध्ये जिल्ह्यासह राज्यातही हा उपक्रम राबविण्यात आला नाही. सर्व शिक्षा अभियानांतर्गत ह्यआनापान वर्गाह्णचे गांभीर्य लक्षात घेऊन हा उपक्रम राबविल्यास संभाव्य अनुचित प्रकार टाळता येतात.