राम देशपांडे / अकोला अँल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये वारंवार अन्नपदार्थ शिजविल्यामुळे, मानवी आरोग्यास घातक ठरणारा अँल्युमिनियम ऑक्साइडचा थर तयार होतो. तो पूर्णत: स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरणार्या अँन्टीऑक्साइडची निर्मिती अकोल्यातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी पालकापासून केली आहे. अँल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये वारंवार अन्नपदार्थ शिजविल्याने रासायनिक अभिक्रिया होऊन, भांड्याच्या आतील भागात अँल्युमिनियम ऑक्साइडचा थर जमा होतो. अन्नातून या रासायनिक पदार्थांचे सेवन झाल्यास, अस्थमा, टीबी, दमा, वातरोग, तोंडाचा अल्सर, अन्ननलिकेतील आजार, तसेच कॅन्सरदेखील होऊ शकतो. म्हणूनच अवघ्या आयुष्यात कोणतेही व्यसन न करणार्यांनाही कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे रूग्ण आढळतात.अकोल्यातील डॉ. हेडगेवार माध्यमिक शाळेमध्ये इयत्ता नववीत शिकणार्या अभिराम कुळकर्णी, मंदार जोशी, ऋषिकेश थोरात, शुभम भटकर या विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्राच्या शिक्षिका रेवती अयाचित-पांडे यांच्या सहाय्याने कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून अँल्युमिनियमच्या भांड्यांच्या स्वच्छतेसाठी उपयुक्त पर्याय शोधला आहे. खराब झालेल्या पालकातून या मुलांनी हरितद्रव्ये एकत्रित केली आणि त्यातून अँल्युमिनियम ऑक्साइड नष्ट करणार्या अँन्टीऑक्साइडची निर्मिती केली. कोणत्याही रासायनिक प्रक्रियेविना पालकापासून तयार केलेली ही भूकटी अँल्युमिनियमची भांडी स्वच्छ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. निशू नर्सरी-कोठारी कॉन्व्हेंटमध्ये पार पडलेल्या ह्यइंटिग्रेटेड सायन्सह्ण या विज्ञान मेळाव्यात या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
अकोल्यातील विद्यार्थ्यांचा ‘युरेका. युरेका.’
By admin | Updated: December 24, 2014 01:08 IST