शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीच्या मुद्यावर विद्यार्थी आक्रमक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:53 IST

अकोला : गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्ती अद्याप  मिळाली नसल्याच्या मुद्यावर विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत,  रखडलेली शिष्यवृत्ती तातडीने विद्यार्थ्यांना देण्यात यावी, या  मागणीसाठी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर  धडक दिली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात  आले.

ठळक मुद्देप्रभाव लोकमतचारखडलेली शिष्यवृत्ती तातडीने विद्यार्थ्यांना द्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्ती अद्याप  मिळाली नसल्याच्या मुद्यावर विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत,  रखडलेली शिष्यवृत्ती तातडीने विद्यार्थ्यांना देण्यात यावी, या  मागणीसाठी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर  धडक दिली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात  आले.शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्ती वाटपात ‘ई-शिष्यवृत्ती’ संकेतस्थळ (वेबसाइट) गत  एप्रिलपासून बंद करण्यात आल्याने, राज्यातील ३५ जिल्हय़ांत १0  लाख ५७ हजार ५४१ विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्तीचे वाटप करण्याची  प्रक्रिया गत चार महिन्यांपासून रखडली आहे. याबाबतचे वृत्त   शुक्रवार, १८ ऑगस्ट रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात  आले, हे येथे उल्लेखनीय. अनुसूचित जाती, विशेष मागासवर्ग  प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व इतर मागासवर्ग प्रवर्गातील  विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.  शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत शिष्यवृत्तीचे वाटप  करण्यात येते; परंतु सन २0१६-१७ च्या शैक्षणिक सत्रात  शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, अकोला  जिल्ह्यासह राज्यातील १0 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांंना अद्यापही  शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही. ई-शिष्यवृत्ती संकेतस्थळ  (वेबसाईट) गत एप्रिलपासून बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांंवर  शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.  यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू झाले असले, तरी शिष्यवृत्ती मिळाली  नसल्याने, अनेक विद्यार्थ्यांंना अडचणींचा सामना करावा लागत  आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांंना ता तडीने शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करीत विद्या र्थ्यांंनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत, मागणीचे निवेदन  जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षकांना सादर करण्यात आले.  यावेळी भारिप-बमसंचे पराग गवई यांच्यासह रवी पाटील, आकाश  अहिरे, अमित मोरे, भूषण खंडारे, सुबोध पाटील, विशाल वाघ,  सागर खंडारे, विशाल गोपनारायण, अंकित गोपनारायण, राहुल  खंडारे, अमीत तेलगोटे, नितीन डोंगरे, सागर मेश्राम, भाऊसाहेब  अंभोरे, विशाल दुपारे, प्रवीण फुलके, गौरव चव्हाण, आशिष  वंजारे, सचिन चव्हाण, नागेश अंभोरे, अजित जठार व इतर विद्या र्थी उपस्थित होते.

..तर तीव्र आंदेलन!शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील विद्या र्थ्यांंना तातडीने शिष्यवृत्ती देण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन  छेडण्यात येणार असल्याचा इशारही विद्यार्थ्यांंच्यावतीने  जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात  आला आहे.