शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

उत्तम रोगप्रतिकारकशक्ती ‘कोरोना’विरूद्धचं प्रभावी शस्त्र - डॉ. श्यामकुमार शिरसाम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 17:47 IST

स्वत:सह इतरांचाही कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. श्यामकुमार शिसराम यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

अकोला : वातावरणातील बदलांमुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला यांसारखे साथीचे आजार उद््भवू शकतात. शिवाय, शहरात गर्दीही वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह इतरांचाही कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. श्यामकुमार शिसराम यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. बदलत्या वातावरणामुळे ‘कोरोना’चा फैलाव होऊ शकतो का?- ऋतुबदलाच्या काळात साथीचे आजार डोके वर काढू लागतात. त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्यापासून बचावासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. फिजिकल डिस्टन्सिंगसह मास्कचा वापर करणे, नियमीत हात धुणे आदि सवयी लावणे आवश्यक आहे. कोरोनाविरूद्धच्या लढ्यात प्रभावी शस्त्र कोणते?- कोरोनाचा विषाणू आपल्यापर्यंत येऊच नये, यासाठी प्रामुख्याने प्रतिबंधात्मक उपाय प्रभावी ठरू शकतात. परंतु, त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनी रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. प्रशासनही उपचारादरम्यान रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी काय करावे?- रोजच्या जेवणात प्रथिनेयुक्त सकस आहाराचे सेवन करावे. यामध्ये प्रामुख्याने दाळी, पालेभाज्या, दुध, गुड-शेंगदाणे आदिंचे सेवन करावे. परंतु, पालेभाज्या घेतल्यानंतर ते योग्य पद्धतीने स्वच्छ करुनच त्याचे सेवन करावे. शिवाय, नियमीत व्यायाम करावा. संतुलीत आहार व निरोगी शरीर असेल, तर कोरोनाचा धोकाही कमी असेल.

 कोरोनाच्या रुग्णांसाठी आरोग्य यंत्रणेकडून काय तयारी?- रुग्णालयाकडे उपलब्ध साधन आणि मनुष्यबळानुसार कोविड रुग्णांना आवश्यक सर्वच सुविधा पुरविण्यात येत आाहेत. रुग्णांना दिल्या जाणाºया जेवणाचा दर्जाही ‘एफडीए’कडून तपासून घेण्यात आला आहे. शिवाय, हे जेवण रुग्णांना देण्यापूर्वी आम्ही स्वत: ते सेवन करतो. शिवाय, रुग्णांच्या नातेवाइकांकडूनही जेवणाच्या दर्जाची पुष्टी केली जात आहे. प्रशासन सर्वोतोपरी रुग्णसेवेस प्राधान्य देत असून, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य केल्यास परिस्थिती आणखी सुधारू शकेल.  

वातावरणातील बदलांपासून आरोग्याचा बचाव कसा करायचा? -  वातावरणातील बदलांमुळे सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही; पण सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये, मास्कचा वापर करावा, वारंवार हात साबनाने धुवावे.

संचारबंदीमध्ये मिळालेली सुट आणि बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांचा धोका पाहता कोरोनाचा आणखी फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कोरोना विरूद्ध लढायचं असेल, तर उत्तम रोगप्रतिकारकशक्ती प्रभावी शस्त्र ठरू शकते. त्यासाठी सकस आहाराचे सेवन करण्यासोबत विषाणूला स्वत:पासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपायही तेवढच प्रभावी ठरणार आहेत. - डॉ. श्यामकुमार शिरसाम,वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला.

टॅग्स :interviewमुलाखतAkolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या