शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उत्तम रोगप्रतिकारकशक्ती ‘कोरोना’विरूद्धचं प्रभावी शस्त्र - डॉ. श्यामकुमार शिरसाम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 17:47 IST

स्वत:सह इतरांचाही कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. श्यामकुमार शिसराम यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

अकोला : वातावरणातील बदलांमुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला यांसारखे साथीचे आजार उद््भवू शकतात. शिवाय, शहरात गर्दीही वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह इतरांचाही कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. श्यामकुमार शिसराम यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. बदलत्या वातावरणामुळे ‘कोरोना’चा फैलाव होऊ शकतो का?- ऋतुबदलाच्या काळात साथीचे आजार डोके वर काढू लागतात. त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्यापासून बचावासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. फिजिकल डिस्टन्सिंगसह मास्कचा वापर करणे, नियमीत हात धुणे आदि सवयी लावणे आवश्यक आहे. कोरोनाविरूद्धच्या लढ्यात प्रभावी शस्त्र कोणते?- कोरोनाचा विषाणू आपल्यापर्यंत येऊच नये, यासाठी प्रामुख्याने प्रतिबंधात्मक उपाय प्रभावी ठरू शकतात. परंतु, त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनी रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. प्रशासनही उपचारादरम्यान रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी काय करावे?- रोजच्या जेवणात प्रथिनेयुक्त सकस आहाराचे सेवन करावे. यामध्ये प्रामुख्याने दाळी, पालेभाज्या, दुध, गुड-शेंगदाणे आदिंचे सेवन करावे. परंतु, पालेभाज्या घेतल्यानंतर ते योग्य पद्धतीने स्वच्छ करुनच त्याचे सेवन करावे. शिवाय, नियमीत व्यायाम करावा. संतुलीत आहार व निरोगी शरीर असेल, तर कोरोनाचा धोकाही कमी असेल.

 कोरोनाच्या रुग्णांसाठी आरोग्य यंत्रणेकडून काय तयारी?- रुग्णालयाकडे उपलब्ध साधन आणि मनुष्यबळानुसार कोविड रुग्णांना आवश्यक सर्वच सुविधा पुरविण्यात येत आाहेत. रुग्णांना दिल्या जाणाºया जेवणाचा दर्जाही ‘एफडीए’कडून तपासून घेण्यात आला आहे. शिवाय, हे जेवण रुग्णांना देण्यापूर्वी आम्ही स्वत: ते सेवन करतो. शिवाय, रुग्णांच्या नातेवाइकांकडूनही जेवणाच्या दर्जाची पुष्टी केली जात आहे. प्रशासन सर्वोतोपरी रुग्णसेवेस प्राधान्य देत असून, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य केल्यास परिस्थिती आणखी सुधारू शकेल.  

वातावरणातील बदलांपासून आरोग्याचा बचाव कसा करायचा? -  वातावरणातील बदलांमुळे सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही; पण सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये, मास्कचा वापर करावा, वारंवार हात साबनाने धुवावे.

संचारबंदीमध्ये मिळालेली सुट आणि बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांचा धोका पाहता कोरोनाचा आणखी फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कोरोना विरूद्ध लढायचं असेल, तर उत्तम रोगप्रतिकारकशक्ती प्रभावी शस्त्र ठरू शकते. त्यासाठी सकस आहाराचे सेवन करण्यासोबत विषाणूला स्वत:पासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपायही तेवढच प्रभावी ठरणार आहेत. - डॉ. श्यामकुमार शिरसाम,वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला.

टॅग्स :interviewमुलाखतAkolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या