शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कर्तव्यात कसूर करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा पगार थांबवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 13:22 IST

ग्राहक सेवा तसेच कर्तव्यात कसूर करणाºया कर्मचाºयांवर पगार कपात करण्याची कारवाई करण्यात येईल, असे साबू यांनी स्पष्ट केले.

अकोला : वसुली ही महावितरणची जीवनवाहिनी असल्यामुळे ग्राहकांना वेळेत वीज बिल भरण्याची सवय लावा, थकबाकीदार ग्राहकांकडे वसुलीसाठी चकरा न मारता त्यांचा थेट वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करा, पुनर्जोडणी आकार भरल्यानंतर पुढील २४ तासांपर्यंत ग्राहकांना अंधारात राहावे लागू शकते, याची जाणीव करून द्या, असे न करणाºया कर्मचाºयांवर पगार थांबविण्यासारखी कारवाई करण्याचे निर्देश महावितरणचे संचालक (संचलन) दिनेशचंद्र साबू यांनी दिले.अकोला विद्युत भवन येथे परिमंडळातील तीनही जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंते पवनकुमार कछोट, दीपक देवहाते, विनोद बेथारिया यांच्यासह तीनही जिल्ह्यांतील कार्यकारी अभियंते प्रदीप पुनसे, अजय खोब्रागडे, प्रशांत दाणी, गजेंद्र गाडेकर, अनिल उईके, बद्रीनाथ जायभाये, दत्तात्रय साळी, रत्नदीप तायडे, नारायण लोखंडे, अविनाश चांदेकर, प्रणाली विश्लेषक राजेश दाभणे व वरिष्ठ व्यवस्थापक गणेश भंडारी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी साबू म्हणाले की, महावितरणच्या सुधारणात्मक धोरणानुसार आपल्याला नेमून दिलेल्या कार्यालयांतर्गत असलेली थकबाकी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार नाही, ज्यांच्या परिसरात रोहित्र जास्त निकामी होतात, वारंवार वीज पुरवठा खंडित होतो, वितरण हानी वाढत आहे, अशा कर्मचाºयांच्या वार्षिक गोपनीय आवाहनात याची नोंद घेतल्या जाईल. ग्राहक सेवा तसेच कर्तव्यात कसूर करणाºया कर्मचाºयांवर पगार कपात करण्याची कारवाई करण्यात येईल, असे साबू यांनी स्पष्ट केले.औद्योगिक ग्राहकांसोबत संवादसाबू यांनी अकोला इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेश मालू, सह प्रतिनिधी मनोज खंडेलवाल, नितीन बियाणी, नरेश बियाणी, आशिष खंडेलवाल, आशिष चंदाराणा व संजय दालमिया यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.यावेळी औद्योगिक ग्राहकांनी महावितरणच्या ग्राहक सुविधेत झालेल्या बदलाबाबत समाधान व्यक्त करीत काही सूचना केल्या. यामध्ये नवीन वीज जोडणी त्वरित मंजूर करणे, पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी तीन दिवसांत वीज जोडणी देणे, नादुरुस्त रोहित्र तत्काळ बदलविणे, फक्त एमआयडीसी परिसराकरिता स्पेशल शाखा अधिकारी उपलब्ध करू देण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी साबू यांनी राबवित असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देत एमआयडीसी ग्राहकांच्या सुविधेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्या जातील, असे आश्वस्त केले.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण