शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

दगडाने ठेचून युवकाची हत्या

By admin | Updated: April 8, 2017 01:46 IST

विझोरा : बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येळवण येथे एका २३ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना ६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता उघडकीस आली.

विझोरा : बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येळवण येथे एका २३ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना ६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी ७ एप्रिल रोजी एका महिलेसह युवकाला ताब्यात घेतले आहे. येळवण येथील दिलीप अरु ण तायडे हा युवक ६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता शौचास जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. एक ते दीड तासापर्यंत तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता तो प्रतिसाद देत नव्हता. काही वेळाने रात्री ९ वाजता तो रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळला. घटनेची माहिती पोलीस पाटील दुर्गा उईके यांनी बार्शीटाकळी पोलिसांना दिली. बार्शीटाकळीचे ठाणेदार सतीश पाटील यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी सोबत आणलेल्या श्वानाने संशयित आरोपीपर्यंत पोहोचवले. त्यानुसार बार्शीटाकळी पोलिसांनी एका महिलेसह युवकाला ताब्यात घेतले आहे. दिलीपचे व संशयित आरोपीचे गावातीलच एका विवाहितेशी अनैतिक संबंध होते. त्यातूनच ही हत्या झाल्याचा संशय आहे. श्वान हिराने शोधला खुनी!दिलीप तायडे युवकाचा दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर अज्ञात आरोपी फरार झाला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा शोध सुरू केला; परंतु आरोपी सापडत नसल्याने, पोलिसांनी श्वान हिराला पाचारण केले. घटनास्थळावर आरोपी व मृतकाच्या चपला पडून होत्या. या चपलांचा हिराला गंध दिल्यावर हिराने गावातील एका घरात प्रवेश केला. घरामध्ये रक्ताचे डाग दिसून आले, तसेच रक्ताने माखलेले टी शर्टसुद्धा मिळाले. घरामध्ये उपस्थित आरोपीच्या अंगावर श्वान गेल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी आरोपीने त्याचे नाव गिरधर चक्रधर तायडे (२१) असे सांगितले आणि हत्येची कबुली दिली. आरोपी शोधून काढल्याबद्दल श्वान पथकाचे पीएसआय सुजित डांगरे, श्वान हस्तक राजीव चौधरी, गोपाल चव्हाण यांना पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी एक हजार रुपये रिवॉर्ड दिला. दिलीपचे ठरले होते लग्न दिलीप तायडे याचे लग्न अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपले होते. विशेष म्हणजे, दिलीपची हत्या होण्यापूर्वीच तो लग्नाचा बस्ता घेऊन आला होता. २३ एप्रिल रोजी त्याचा विवाह मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवा मेळ येथील मुलीशी होणार होता. अनैतिक संबंधातून हत्यादिलीप व गिरधर तायडे चुलतभाऊ होते. गावातीलच एका महिलेसोबत दोन्ही युवकांचे अनैतिक संबंध होते. यातून दोघांमध्येही नेहमीच खटके उडायचे. या वादातूनच गिरधरने त्याच्या मार्गात अडसर ठरत असलेल्या दिलीपचा काटा काढल्याची चर्चा गावामध्ये आहे.