शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

दगडाने ठेचून युवकाची हत्या

By admin | Updated: April 8, 2017 01:46 IST

विझोरा : बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येळवण येथे एका २३ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना ६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता उघडकीस आली.

विझोरा : बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येळवण येथे एका २३ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना ६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी ७ एप्रिल रोजी एका महिलेसह युवकाला ताब्यात घेतले आहे. येळवण येथील दिलीप अरु ण तायडे हा युवक ६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता शौचास जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. एक ते दीड तासापर्यंत तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता तो प्रतिसाद देत नव्हता. काही वेळाने रात्री ९ वाजता तो रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळला. घटनेची माहिती पोलीस पाटील दुर्गा उईके यांनी बार्शीटाकळी पोलिसांना दिली. बार्शीटाकळीचे ठाणेदार सतीश पाटील यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी सोबत आणलेल्या श्वानाने संशयित आरोपीपर्यंत पोहोचवले. त्यानुसार बार्शीटाकळी पोलिसांनी एका महिलेसह युवकाला ताब्यात घेतले आहे. दिलीपचे व संशयित आरोपीचे गावातीलच एका विवाहितेशी अनैतिक संबंध होते. त्यातूनच ही हत्या झाल्याचा संशय आहे. श्वान हिराने शोधला खुनी!दिलीप तायडे युवकाचा दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर अज्ञात आरोपी फरार झाला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा शोध सुरू केला; परंतु आरोपी सापडत नसल्याने, पोलिसांनी श्वान हिराला पाचारण केले. घटनास्थळावर आरोपी व मृतकाच्या चपला पडून होत्या. या चपलांचा हिराला गंध दिल्यावर हिराने गावातील एका घरात प्रवेश केला. घरामध्ये रक्ताचे डाग दिसून आले, तसेच रक्ताने माखलेले टी शर्टसुद्धा मिळाले. घरामध्ये उपस्थित आरोपीच्या अंगावर श्वान गेल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी आरोपीने त्याचे नाव गिरधर चक्रधर तायडे (२१) असे सांगितले आणि हत्येची कबुली दिली. आरोपी शोधून काढल्याबद्दल श्वान पथकाचे पीएसआय सुजित डांगरे, श्वान हस्तक राजीव चौधरी, गोपाल चव्हाण यांना पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी एक हजार रुपये रिवॉर्ड दिला. दिलीपचे ठरले होते लग्न दिलीप तायडे याचे लग्न अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपले होते. विशेष म्हणजे, दिलीपची हत्या होण्यापूर्वीच तो लग्नाचा बस्ता घेऊन आला होता. २३ एप्रिल रोजी त्याचा विवाह मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवा मेळ येथील मुलीशी होणार होता. अनैतिक संबंधातून हत्यादिलीप व गिरधर तायडे चुलतभाऊ होते. गावातीलच एका महिलेसोबत दोन्ही युवकांचे अनैतिक संबंध होते. यातून दोघांमध्येही नेहमीच खटके उडायचे. या वादातूनच गिरधरने त्याच्या मार्गात अडसर ठरत असलेल्या दिलीपचा काटा काढल्याची चर्चा गावामध्ये आहे.