शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

तब्येत सांभाळा; पाऊस थांबला, उन्हाचा चटकादेखील वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:23 IST

अकोला : गत तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली असून उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. ...

अकोला : गत तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली असून उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. जिल्ह्यात जवळपास २० दिवसांच्या खंडानंतर पावसाचे आगमन झाले. यामुळे कोमेजलेल्या पिकांना जीवदान मिळाले. सलग पाच दिवस पाऊस बरसल्यानंतर सहाव्या दिवशी पावसाने उघडीप दिली. मागील तीन दिवसांपासून पावसाची दडी आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. रिपरिप पावसाच्या वातावरणानंतर एकाएक कडाक्याचे ऊन तपायला लागल्याने उकाडा जाणवू लागला आहे. नागरिकही हैराण झाले आहेत. त्यातच पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. वारंवार बदलत्या वातावरणाने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

आकडेवारी काय सांगते?

महिना अपेक्षित पाऊस झालेला पाऊस किमान तापमान कमाल तापमान

जून १७२.३ मिमी १३६.९ मिमी २०.६ ३५.४

जुलै २५४.९ मिमी ३०६.८ मिमी १९.५ ३२.०

ऑगस्ट १६९.८ मिमी १२१.२ मिमी २२.४ ३३.१

कोठे किती पाणीसाठा

प्रकल्प पाणीसाठा (दलघमी) पाणीसाठा (टक्क्यांत)

काटेपूर्णा ८०.५० ९३.२३

वान ५९.०१ ७२.०१

निर्गुणा २८.८५ १००

ऑगस्टमध्ये सर्वांत कमी पाऊस

जिल्ह्यात जून महिन्यात सुरुवातीलाच चांगला दमदार पाऊस पडला होता.

तर जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली होती.

या महिन्यात २१ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने सर्वाधिक पावसाची नोंद झाली.

मात्र, ऑगस्ट महिन्यात सर्वांत कमी पावसाची नोंद झाली. तीन दिवस कोरडे गेले.

वातावरण बदलले; काळजी घ्या...

गत तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने वातावरणात बदल झाला आहे.

त्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून काळजी घेण्याची गरज आहे.

त्यातच डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्याने आणखी सतर्कता बाळगावी.

अनेक साथीचे आजार बळावत असून गरज पडल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.