शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कृषीच्या विशेष घटक योजनेचा राज्यभरात गोंधळ

By admin | Updated: January 22, 2017 03:05 IST

योजनेतील बदलाबाबत मार्गदर्शन मागविले

अकोला, दि. २१- कृषी विभागाकडून राबविल्या जाणार्‍या विशेष घटक योजनेत शासनाने बदल केला. त्यामुळे चालू वर्षातील नवीन लाभार्थी निवडीचा गोंधळ झाला आहे. त्यामुळे चालू वर्षात योजना राबविण्यासाठी शासनाकडूनच पुणे येथील कृषी उपसंचालक कार्यालयाने मार्गदर्शन मागविले आहे. त्यातच अनेक जिल्हय़ातील निवड प्रक्रियाही आचारसंहितेमुळे रखडली आहे. अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकर्‍यांसाठी कृषी विभागाने १९८२-८३ पासून विशेष घटक योजना सुरू केली होती. त्या योजनेतून शेतकरी लाभार्थींना जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पीक संरक्षण अवजारे, शेतीची सुधारित अवजारे, बैलजोडी, बैलगाडी, इनवेल बोअरिंग, जुनी विहीर दुरुस्ती, पाइपलाइन, पंपसेट, नवीन विहीर निर्मितीसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येत होते. दरम्यान, शासनाने चालू वर्षात योजनेचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असे करण्यात आले. तसेच लाभाचे स्वरूपही बदलले. योजनेतून शेतकर्‍यांना प्राधान्याने विहिरीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी अनुदानाची कमाल रक्कम २ लाख ८५ हजार रुपये आहे. त्यामध्ये नवीन विहीर, त्यासोबत वीज जोडणी, पंपसंच, सूक्ष्म सिंचनासाठी २0१७-१८ पासून शेतकर्‍यांची निवड केली जाणार आहे; मात्र चालू योजनेसाठी २0१६-१७ या वर्षात निवड झालेल्या लाभार्थींना त्याचा लाभ दिला जाणार नाही. जुन्या दरानेच रक्कम दिली जाईल, असे शासन निर्णयात म्हटले आहे; मात्र त्या शासन निर्णयातील चार मुद्यांमुळे निवड समितीचा गोंधळ झाला आहे. - निर्णयातील चार मुद्दे ठरले डोकेदुखीशासनाच्या ५ जानेवारी २0१७ रोजीच्या निर्णयातील चार मुद्यांवर राज्यभरातील अधिकारी गोंधळले आहेत. त्यामध्ये मुद्दा क्रमांक तीनमध्ये निर्णयापूर्वी निवड झालेले आणि नंतरचे लाभार्थी, पाचमध्ये चालू वर्षातील लाभार्थींना नवीन विहिरींसाठी नव्या दराने व इतर लाभार्थींना जुन्या दराने अनुदान देण्याचे म्हटले आहे. मुद्दा क्रमांक १३ मध्ये महावितरणकडून सोलर पंप मंजूर असेल, तर अनुदानाची रक्कम कंपनीला देणे, मुद्दा क्रमांक १७ मध्ये विहिरींचे उद्दिष्ट डिसेंबर २0१७ पर्यंत पूर्ण करण्याचे म्हटले आहे. त्यावर मार्गदर्शन करावे, असे पत्र कृषी विभागाने शासनाकडे १0 जानेवारी रोजी पाठविले आहे.  शासन निर्णयातील काही मुद्यांनुसार योजनेची अंमलबजावणी कशी करावी, यावर शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. ते मिळताच निवड समित्यांकडून कार्यवाही सुरू केली जाईल. - घाडगे, उपसंचालक, कृषी आयुक्त कार्यालय, पुणे.