शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला राज्य शासनाने घटनापीठाकडे आव्हान द्यावे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:17 IST

अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा फटका राज्यातील सहा जिल्हा परिषदांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (ओबीसी) ...

अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा फटका राज्यातील सहा जिल्हा परिषदांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (ओबीसी) ८५ सदस्य आणि त्याअंतर्गत २७ पंचायत समित्यांमधील ११६ सदस्यांना बसला आहे. ओबीसी प्रवर्गातील या सर्व सदस्यांची पदे रिक्त घोषित करण्यात आली असून, लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालास राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे पुनर्विचार याचिका दाखल करून आव्हान देण्याची मागणी ओबीसी महासंघाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिवांकडे शनिवारी निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमधील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ४ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निकालानुसार अकोला, वाशिम, नागपूर, धुळे, नंदुरबार व पालघर, इत्यादी सहा जिल्हा परिषदांमधील ओबीसी प्रवर्गातील ८५ सदस्य आणि या जिल्हा परिषदांतर्गत २७ पंचायत समित्यांमधील ओबीसी प्रवर्गाच्या ११६ सदस्यांची पदे रिक्त झाली आहेत. या सर्व ठिकाणी नव्याने निवडणुका घेण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे ओबीसी सदस्यांना न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालास राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे पुनर्विचार याचिका दाखल करून आव्हान द्यावे, अशी मागणी ओबीसी महासंघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व मुख्य सचिवांकडे पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बालमुकुंद भिरड, कार्याध्यक्ष ॲड. संतोष राहाटे, डाॅ. नीलेश उन्हाळे, मुस्ताक शहा, गोपाल राऊत, गोपाल कोल्हे, डाॅ. ओमप्रकाश धर्माळ, प्रदीप मांगुळकर, किरण बोराखडे, सचिन जामोदे, नाना मेहेर, शंकरराव गिरे, विठ्ठल राऊत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील ओबीसी प्रवर्गातील सदस्यांची पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे ओबीसींना न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालास राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे पुनर्विचार याचिका दाखल करून आव्हान देण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री व मुख्य सचिवांकडे निवेदन पाठवून मागणी केली आहे.

बालमुकुंद भिरड

अध्यक्ष, ओबीसी महासंघ, अकोला