शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

धरण क्षेत्रातील कृषी पंपांच्या जोडण्या काढण्यास सुरुवात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:35 IST

पावसाने यावर्षी जिल्हय़ाकडे पाठ फिरविल्याने धरणात अल्प जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराची तहान भागविणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस १७.३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, हे पाणी केवळ पिण्यासाठीच आरक्षित ठेवले जाणार आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील कृषी पंपाच्या जोडण्या काढण्यात येत आहेत. एक तर पाऊस नाही, शेतकरी धरणाच्या पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न करीत असताना कृषी पंपच बंद केल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देआता पाणी केवळ पिण्यासाठीच आरक्षित शेतकरी संकटात

राजरत्न सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाने यावर्षी जिल्हय़ाकडे पाठ फिरविल्याने धरणात अल्प जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराची तहान भागविणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस १७.३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, हे पाणी केवळ पिण्यासाठीच आरक्षित ठेवले जाणार आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील कृषी पंपाच्या जोडण्या काढण्यात येत आहेत. एक तर पाऊस नाही, शेतकरी धरणाच्या पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न करीत असताना कृषी पंपच बंद केल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.आजमितीस ११.४४ दलघमी उपयुक्त जिवंत जलसाठा शिल्लक आहे, तसेच वाढते तापमान, बाष्पीभवन, जीर्ण जलवाहिन्यांमुळे पाण्याची नासाडी होत आहे, त्यामुळे पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनाने काटेपूर्णा धरणासह इतर धरण क्षेत्रातील कृषी पंपाच्या जोडण्या काढण्याचा निर्णय घेतला असून, काटेपूर्णा धरण क्षेत्रातील जोडण्या काढण्यात सुरुवात केली आहे. जिल्हय़ातील धरणात जेमतेम जलसाठा शिल्लक असून, काटेपूर्णा धरणात आजमितीस १७.३१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामध्ये ६.७५ दलघमी एवढा गाळ आहे. म्हणजे धरणात काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला शहर, औद्योगिक वसाहत, मूर्तिजापूर शहर, साठ खेडी पाणीपुरवठा योजनेला पाणी सोडले होते; परंतु पाणी नसल्याने मूर्तिजापूर शहर व साठ खेड्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, औद्योगिक वसाहतीला केवळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.काटेपूर्णा प्रकल्पासह जिल्ह्यातील इतर प्रकल्पांची अवस्था वाईट आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा या मध्यम प्रकल्पात आजमितीस केवळ 0.४४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पातूर तालुक्यातील मोर्णा धरणात १७.५३ टक्के, तर निर्गुणा प्रकल्पात ३८.0९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्हय़ातील सर्वच मोठे, मध्यम तथा लघू प्रकल्पाची स्थिती बघितल्यास केवळ २९.0५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. 

धरणात ६.७५ दलघमी गाळ!जिल्हय़ातील धरणात जेमतेम जलसाठा शिल्लक असून, काटेपूर्णा धरणात आजमितीस १७.३१ टक्के जलसाठा  उपलब्ध आहे. त्यामध्ये ६.७५ दलघमी एवढा गाळ आहे. नाशिक येथील मध्यवर्ती संकल्पचित्र संस्थेने रिमोट सेन्सिंगद्वारे काटेपूर्णा धरणातील गाळाचे सर्वेक्षण केले असून, ६.७५ दलघमी गाळ असल्याचा या संस्थेच्या अहवालात नमूद आहे.

वान धरणाचे पाण्याचे लवकरच आरक्षण यावर्षीची धरणातील जलसाठय़ाची स्थिती बघता जिल्हय़ातील धरणातील पाणी पिण्यासाठीच आरक्षित ठेवले जाणार आहे, तसेच शासनाची अमृत योजनेंतर्गत वान धरणातील पाणीदेखील आरक्षित ठेवले जाणार आहे. 

शेतकर्‍यांवर संकट प्रथम प्राध्यान्य पिण्याच्या पाण्यासाठी असल्याने या परिस्थितीत धरणातील पाणी पिकांना देता येणार नाही. त्यामुळेच धरण क्षेत्रातील कृषी पंपाच्या जोडण्या काढण्यात येत आहेत. याचा फटका शेती क्षेत्राला बसणार आहे. 

जिल्हय़ातील जलसाठय़ाची स्थिती बघता धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच आरक्षित ठेवले जाणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू  झाली आहे. काटेपूर्णा धरण क्षेत्रातील पाणी इतर कारणासाठी देण्याचे बंद करण्यात येत आहे.- जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.