शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

रस्त्यांवर साचले पाणी; अकोलेकरांची तारांबळ

By admin | Updated: January 2, 2015 01:34 IST

खड्डय़ांमुळे नागरिकांच्या समस्येत भर.

अकोला : नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून, अकोलेकरांची चांगलीच तारांबळ उडत आहे. खड्डय़ांमुळे मुख्य रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र गुरुवारी पहावयास मिळाले. अतवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याने दीड वर्षांपूर्वी शासनाकडून रस्ते दुरुस्तीसाठी १५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले होते. लोकसभा व त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याची सबब पुढे करीत प्रशासनाने १५ कोटींच्या निविदा काढल्या नाहीत. सत्तापक्षासोबत समन्वय व नियोजनाच्या अभावामुळे अद्यापपर्यंत रस्ते दुरुस्तीला प्रारंभ होऊ शकला नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डय़ांचे जाळे निर्माण झाल्यामुळे अकोलेकरांना विविध आजारांनी त्रस्त करून सोडले आहे. खड्डय़ांमुळे मानेचे दुखणे, कंबरदुखी, स्पाँडिलायटीस, स्लीप डिस्कसारख्या आजारांची देण अकोलेकरांना लाभली असून, प्रशासन मात्र नियोजन करण्यात दंग आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यावर साचले असून, खड्डय़ांमधून वाट काढताना अकोलेकरांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.