शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्रॅव्हल्सला पसंती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:13 IST

कोरोच्या संकट काळातही एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवाशांना मोठा आधार दिला. इतर राज्यांपर्यंतचा पल्ला गाठत मजुरांना त्यांच्या गावापर्यंत सोडले होते. ...

कोरोच्या संकट काळातही एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवाशांना मोठा आधार दिला. इतर राज्यांपर्यंतचा पल्ला गाठत मजुरांना त्यांच्या गावापर्यंत सोडले होते. जिल्हाअंतर्गत असो की इतर जिल्ह्यात प्रवाशांकडून एसटी बसला प्राधान्य देण्यात येते. एसटीचा प्रवास हा सुखकर प्रवास मानला जातो; परंतु गत काही वर्षांपासून खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास वाढला आहे. पुणे, मुंबई, नागपूर यासारख्या मोठ्या शहरात जाण्यासाठी ट्रॅव्हल्समधून प्रवास होत आहे.

एसटीला स्पीड लॉक, ट्रॅव्हल्स सुसाट

एसटी महामंडळाच्या बसेसचा स्पीड लॉक केलेला असतो. ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेसचा स्पीड ६५ किलोमीटर प्रति तास, लांब व मध्यम पल्ल्याच्या ७० वर आणि शिवशाही ७५ ते ८० पर्यंत स्पीड लॉक करण्यात येतो. त्या तुलनेत ट्रॅव्हल्सचा स्पीड थोडा अधिक असतो. ट्रॅव्हल्सचा स्पीड ८० वर लॉक केलेला असतो. त्यामुळे एसटी बसच्या तुलनेत ट्रॅव्हल्स सुसाट वेगाने धावताना दिसतात.

आराम महत्त्वाचा की सुरक्षित प्रवास

ट्रॅव्हल्सने आरामदायी प्रवास होत असल्यामुळे मी खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला पसंती देतो. याशिवाय अपघात झाल्यास एसटीकडून भरपाई मिळते ; परंतु खासगी ट्रॅव्हल्सकडून मोबदला मिळतो की नाही माहिती नाही.

- प्रदीप मते, प्रवासी

सुरुवातीपासून ट्रॅव्हल्सने प्रवास करतो ; परंतु आजपर्यंत कधीच अपघात झाल्याचा अनुभव आला नाही. ट्रॅव्हल्सनेही सुरक्षित प्रवास होत असल्यामुळे ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला प्राधान्य देतो. जवळपास जाण्यासाठी एसटीने प्रवास करतो.

- विजय गवई, प्रवासी

...म्हणून अपघाताची शक्यता कमीच!

ट्रॅव्हल्सचा प्रवास आरामदायी असतो. अपघात झाल्यास इन्शुरन्सचे पैसे मिळतात. एखादी महिला एकट्याने प्रवास करीत असेल तर तिच्या बाजूला पुरुष प्रवाशाला सीट देण्यात येत नाही. तसेच १० ते १२ वर्षांला ट्रॅव्हल्स गाडी बदलण्यात येत असल्यामुळे अपघाताची शक्यता राहत नसल्याचे ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने सांगितले.

विभागातील एसटी बसेस

३८३

शहरातून निघणाऱ्या ट्रॅव्हल्स

४०