शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

एसटी-मोटारसायकलची समोरासमोर धडक; दोन ठार

By admin | Updated: May 4, 2015 01:16 IST

धाडनाकाजवळील घटना; मृतकात काका-पुतण्याचा समावेश.

बुलडाणा : येथील रविवारच्या बाजारातील हरासीतील भाजी घेण्यासाठी शहराकडे येणार्‍या मोटारसायकलीस भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने धडक दिली. त्यात मोटारसायकलवरील दोन व्यक्ती ठार झाल्या. सदर घटना बुलडाणा शहराजवळील धाड नाका परिसरात ३ मे रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान घडली असून, मृतकात काका-पुतण्याचा समावेश आहे. बुलडाणा तालुक्यातील चांडोळ येथील रहिवासी अलताफ खान अय्युब खान (वय ३0) व रहीम खान मुनाफ खान (वय २२) हे दोन्ही काका-पुतण्या भाजी विक्रेते आहेत. रविवारी चांडोळ येथे आठवडी बाजार भरत असून, या बाजारात भाजी विक्री करायची असल्यामुळे बुलडाणा येथील हरासी म्हणून भाजी विकत घेण्यासाठी दोन्ही आज सकाळी एमएच २८, २७५८ या क्रमांकाच्या मोटारसायकलने बुलडाण्याकडे निघाले. दरम्यान, बुलडाणा शहरातील धाड नाका परिसरात बुलडाण्याहून चांडोळकडे जाणारी एमएच ४0, ८४१८ क्रमांकाच्या एसटी महामंडळाच्या बसचालकाने समोरून येणार्‍या मोटारसायकलीस जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकल बसच्या पुढच्या चाकात येऊन काही अंतरापर्यंत घासत गेली. त्यात मोटारसायकलवरील अलताफ खान अय्युब खान व रहीम खान मुनाफ खान दोन्ही घासत गेले. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी दोघांनाही मृत घोषित केले. याप्रकरणी मृतकचा भाऊ अकरम खान अय्युब खान पठान यांनी दिलेल्या तक्रारीवरून एसटी चालक पंढरी भगवान पालकर (वय ४६) याच्याविरुद्ध भादंवि ३0४ अ, २७९, ४२७ व मोटार वाहन कायदा १८४ नुसार गुन्हा दाखल करून बसचालकास अटक केली आहे.