शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कृषी उद्योग निर्माण करण्यावर ‘आत्मा’चा भर!

By admin | Updated: December 16, 2014 00:57 IST

उद्योग उभारणीसाठी शेतक-यांना मिळणार अर्थसहाय्य

अकोला : शेतकर्‍यांमधून कृषी उद्योजक निर्माण करण्यावर कृषी तंत्रज्ञान व्यवसाय यंत्रणेने (आत्मा) भर दिला असून, कृषी उद्योग टाकण्यासाठी शेतकर्‍यांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे.राज्यातह्यआत्माह्णकडून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. पीक उत्पादन आणि उत्पादकता वाढ व वाढीव बाजाराच्या संधी, हे या प्रकल्पाचे मूळ उद्दिष्ट आहे. याच प्रकल्पाच्या माध्यमातून २0१४-१५ मध्ये कृषी उद्योजकता विकास योजना सुरू करण्यात आली आहे. या विकास कार्यक्रमांतर्गत कृषी उद्योजक गट, या प्रकल्पांतर्गत कार्यक्षेत्रातील शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांना या योजनेतून कृषी उद्योग प्रकल्प सुरू करता येणार आहेत. या गट, कंपन्या आणि संस्थांना काढणीपश्‍चात तंत्रज्ञान व्यवस्थापन, धान्य व फळेविषयक प्रकल्प, मूल्यवर्धन व प्रक्रिया, प्रतवारी व पणन प्रकल्प, कृषी मूल्यवर्धन यांत्रिकीकरण प्रकल्प, कृषी व्यवसाय प्रोत्साहन उपक्रम, बाजाराभिमुख सेंद्रिय कृषी उत्पादन, प्रतवारी व पणन प्रोत्साहन प्रकल्प, या विविध प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या प्रकल्पाकरिता अहवाल व प्रस्ताव तयार करण्याची गरज असून, या कृषी उद्योजकता प्रस्तावातील उभारणीसाठी लागणार्‍या केवळ मशिनरी व उपकरणांनाच अर्थसहाय्य दिले जाणार आहे. मशिनरी व उपकरणे यावरील खर्चाच्या ५0 टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख एवढे अनुदान दिले जाणार आहे. या प्रकल्पाला कि मान सहा वर्ष यशस्विरीत्या चालविणे बंधनकारक आहे. गट, संस्था आणि कंपनी असलेल्या लाभार्थींनी या प्रकल्पांना पूर्वसंमती मिळावी यासाठी अर्ज करावे लागणार आहेत. हे अर्ज प्रकल्प संचालक , आत्मा कार्यालय, अकोला येथे उपलब्ध आहेत.