शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी उद्योग निर्माण करण्यावर ‘आत्मा’चा भर!

By admin | Updated: December 16, 2014 00:57 IST

उद्योग उभारणीसाठी शेतक-यांना मिळणार अर्थसहाय्य

अकोला : शेतकर्‍यांमधून कृषी उद्योजक निर्माण करण्यावर कृषी तंत्रज्ञान व्यवसाय यंत्रणेने (आत्मा) भर दिला असून, कृषी उद्योग टाकण्यासाठी शेतकर्‍यांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे.राज्यातह्यआत्माह्णकडून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. पीक उत्पादन आणि उत्पादकता वाढ व वाढीव बाजाराच्या संधी, हे या प्रकल्पाचे मूळ उद्दिष्ट आहे. याच प्रकल्पाच्या माध्यमातून २0१४-१५ मध्ये कृषी उद्योजकता विकास योजना सुरू करण्यात आली आहे. या विकास कार्यक्रमांतर्गत कृषी उद्योजक गट, या प्रकल्पांतर्गत कार्यक्षेत्रातील शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांना या योजनेतून कृषी उद्योग प्रकल्प सुरू करता येणार आहेत. या गट, कंपन्या आणि संस्थांना काढणीपश्‍चात तंत्रज्ञान व्यवस्थापन, धान्य व फळेविषयक प्रकल्प, मूल्यवर्धन व प्रक्रिया, प्रतवारी व पणन प्रकल्प, कृषी मूल्यवर्धन यांत्रिकीकरण प्रकल्प, कृषी व्यवसाय प्रोत्साहन उपक्रम, बाजाराभिमुख सेंद्रिय कृषी उत्पादन, प्रतवारी व पणन प्रोत्साहन प्रकल्प, या विविध प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या प्रकल्पाकरिता अहवाल व प्रस्ताव तयार करण्याची गरज असून, या कृषी उद्योजकता प्रस्तावातील उभारणीसाठी लागणार्‍या केवळ मशिनरी व उपकरणांनाच अर्थसहाय्य दिले जाणार आहे. मशिनरी व उपकरणे यावरील खर्चाच्या ५0 टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख एवढे अनुदान दिले जाणार आहे. या प्रकल्पाला कि मान सहा वर्ष यशस्विरीत्या चालविणे बंधनकारक आहे. गट, संस्था आणि कंपनी असलेल्या लाभार्थींनी या प्रकल्पांना पूर्वसंमती मिळावी यासाठी अर्ज करावे लागणार आहेत. हे अर्ज प्रकल्प संचालक , आत्मा कार्यालय, अकोला येथे उपलब्ध आहेत.