शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

कृषी उद्योग निर्माण करण्यावर ‘आत्मा’चा भर!

By admin | Updated: December 16, 2014 00:57 IST

उद्योग उभारणीसाठी शेतक-यांना मिळणार अर्थसहाय्य

अकोला : शेतकर्‍यांमधून कृषी उद्योजक निर्माण करण्यावर कृषी तंत्रज्ञान व्यवसाय यंत्रणेने (आत्मा) भर दिला असून, कृषी उद्योग टाकण्यासाठी शेतकर्‍यांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे.राज्यातह्यआत्माह्णकडून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. पीक उत्पादन आणि उत्पादकता वाढ व वाढीव बाजाराच्या संधी, हे या प्रकल्पाचे मूळ उद्दिष्ट आहे. याच प्रकल्पाच्या माध्यमातून २0१४-१५ मध्ये कृषी उद्योजकता विकास योजना सुरू करण्यात आली आहे. या विकास कार्यक्रमांतर्गत कृषी उद्योजक गट, या प्रकल्पांतर्गत कार्यक्षेत्रातील शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांना या योजनेतून कृषी उद्योग प्रकल्प सुरू करता येणार आहेत. या गट, कंपन्या आणि संस्थांना काढणीपश्‍चात तंत्रज्ञान व्यवस्थापन, धान्य व फळेविषयक प्रकल्प, मूल्यवर्धन व प्रक्रिया, प्रतवारी व पणन प्रकल्प, कृषी मूल्यवर्धन यांत्रिकीकरण प्रकल्प, कृषी व्यवसाय प्रोत्साहन उपक्रम, बाजाराभिमुख सेंद्रिय कृषी उत्पादन, प्रतवारी व पणन प्रोत्साहन प्रकल्प, या विविध प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या प्रकल्पाकरिता अहवाल व प्रस्ताव तयार करण्याची गरज असून, या कृषी उद्योजकता प्रस्तावातील उभारणीसाठी लागणार्‍या केवळ मशिनरी व उपकरणांनाच अर्थसहाय्य दिले जाणार आहे. मशिनरी व उपकरणे यावरील खर्चाच्या ५0 टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख एवढे अनुदान दिले जाणार आहे. या प्रकल्पाला कि मान सहा वर्ष यशस्विरीत्या चालविणे बंधनकारक आहे. गट, संस्था आणि कंपनी असलेल्या लाभार्थींनी या प्रकल्पांना पूर्वसंमती मिळावी यासाठी अर्ज करावे लागणार आहेत. हे अर्ज प्रकल्प संचालक , आत्मा कार्यालय, अकोला येथे उपलब्ध आहेत.