शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

खारपाणपट्टय़ात टँकरद्वारे पाणीपुरवठय़ासाठी दरमहा होणार  अडीच कोटी खर्च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:21 IST

अकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१  गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला  आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठय़ासाठी दरमहा अडीच कोटी रु पयांचा खर्च होणार आहे.

ठळक मुद्दे६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठापाच शासकीय, ४0 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१  गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला  आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठय़ासाठी दरमहा अडीच कोटी रु पयांचा खर्च होणार आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी  उलटून गेला; मात्र दमदार पाऊस झाला नसल्याने, अकोला  शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४  गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा  धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद  करण्यात आला आहे. खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ  दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु उन्नई  बंधार्‍यातील पाणी संपल्याने योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा  गत ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला. त्यामुळे योजनेंतर्ग त गावांमध्ये जलसंकटाची परिस्थिती निर्माण आहे.  त्यानुषंगाने, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत  पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू  करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी ७ सप्टेंबर रोजी दिला.  त्यानुसार १0 सप्टेंबरपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू  करण्यात आला आहे. ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत  अकोट आणि देवरी फाटा येथील जमिनीखालील पाण्याच्या  टाकीतून ६१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात  आला आहे. अकोट आणि देवरी फाटा येथून या गावांना ४५  टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी वाहतूक खर्च आणि  टँकर भाड्यापोटी दरमहा २ कोटी ५0 लाख रुपयांचा खर्च  होणार आहे. हा खर्च भागविण्यासाठी टंचाई अंतर्गत  जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे निधीची मागणी  करण्यात येणार आहे.

पाच शासकीय, ४0 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा!पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू  करण्यात आला. त्यामध्ये पाच शासकीय टँकर आणि ४0  खासगी टँकरचा समावेश आहे. ४0 खासगी टँकरद्वारे भाडे तत्त्वावर पाणीपुरवठा करण्यासाठी  हैदराबाद येथील एका  निविदाधारकासोबत जिल्हा प्रशासनामार्फत करारनामा  करण्यात आला आहे. त्यानुसार पाणीटंचाई संपुष्टात येईपर्यंंंत  संबंधित गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.